इव्हीएमवर भरवसा ठेऊ नका- यशवंत सिन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 09:07 PM2018-05-09T21:07:04+5:302018-05-09T21:07:04+5:30

काँग्रेसला श्रेय मिळू नये म्हणून सरकारने जीडीपीचा खोटा आकडा दाखवला.

Don't believe on EVM machines says Yashwant Sinha | इव्हीएमवर भरवसा ठेऊ नका- यशवंत सिन्हा

इव्हीएमवर भरवसा ठेऊ नका- यशवंत सिन्हा

Next

पणजी: इलेक्ट्रोनिक वोटिंग मशिन्सवर (इव्हीएम)भरवसा ठेऊ नका, लोकांचे मत वेगळे आणि मशिन्सचे मत वेगळे होण्याची पूर्ण शक्यता असल्याचा इशारा माजी केंद्रीय अथर्मंत्री यशवंत सिन्हा यांनी दिला आहे. दोनापावला येथील इंटरनेशनल सेंटरमध्ये बोलताना त्यांनी देशात अघोषित आणिबाणी लागू  करण्यात आल्याचे सांगितले. 

सिटिझन्स फॉर डेमॉक्रोसी या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना सिन्हा यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारवर कडक टीका केली. इव्हीएमवर भरवसा ठेवणे कठीण असून इव्हीएमचे मत आणि लोकांचे मत हे सारखे असेलच हे सांगता येत नाही. काही ठिकाणी घेण्यात आलेल्या चाचणीत ९ इव्हीएमद्वारे करण्यात आलेल्या मतदानात १० पैकी ८ मते ही भाजपच्या बाजूने झाली होती असे त्यांनी सांगितले. मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचा आपला आग्रह असल्याचेही त्यांनी सांगितले. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दिवसात कपात करण्याचे काम या सरकारने केले असून हा प्रकार दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी  तीन दिवस सामान्य अर्थसंकल्पावर तर ३ दिवस रेल्वे अर्थसंकल्पावर चर्चा केली जात होती. आता दोन्ही अर्थसंकल्प एकत्र केल्यानंतर दोन्ही अर्थसंकल्पांना मिळून दीड दिवसच दिला जातो. त्यातही चर्चा होवू दिली जात नाही. अण्णाद्रमुक पक्षाचे खासदार सभागृहात गोंधळ घालतात आणि कामकाज स्थगित ठेवले जाते. अण्णाद्रमुक हा भाजपाशी जवळीक असलेला पक्ष असून हे हेतूपुरस्सर सरकारपक्षाकडूनच केले जाते असा आरोपही त्यांनी केला. 

देशाचा आर्थिक विकास हा खुंटला गेला आहे. सरकारकडून चुकीचे आकडे दाखविले जात आहेत. २०१४ साली दाखविण्यात आलेला ४.५ हा विकास दर चुकीचा असून तो ६.५ एवढा होता. काँग्रेसला श्रेय मिळू नये म्हणून तो चुकीच्या पद्धतीने चुकीचा दर दाखविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या ४ न्यायाधीशांनी पत्रकार परीषद घेऊनही देशातील लोक सावध होत नसेल तर ते दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. 

मंत्री नव्हे लोकांचा संत्री: शत्रुघ्न
आपल्याच पक्षाच्या विरोधात रणशिंग फुंकलेले भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मंत्री नव्हे आपण जनतेसमोर खरे ते बोलू नये म्हणून आपल्याला मंत्रीपदाची लालच दाखविली जात असल्याचे सांगितले. परंतु आपण मंत्री बनण्यापेक्षा जनतेचा संत्री होणे पसंत करेन, असे त्यांनी सांगितले. देशात अत्यंत वाईट परिस्थिती असून दलित, अल्पसंख्याक, शेतकरी व कामगार वर्ग दहशतीच्या छायेत असल्याचेही त्यांनी सांगितले.    

Web Title: Don't believe on EVM machines says Yashwant Sinha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.