गुन्हेगारी, दहशतवादावर ऋषीमुनींचे वेदच एकमेव उपाय : सत्यपाल सिंह

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 08:20 AM2018-10-26T08:20:29+5:302018-10-26T10:12:48+5:30

आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंदही उपस्थित होते. 

crime, terrorism will vanish only by vedas : Satyapal Singh | गुन्हेगारी, दहशतवादावर ऋषीमुनींचे वेदच एकमेव उपाय : सत्यपाल सिंह

गुन्हेगारी, दहशतवादावर ऋषीमुनींचे वेदच एकमेव उपाय : सत्यपाल सिंह

Next

नवी दिल्ली : देशातील गुन्हेगारी, दहशतवाद आणि जेवढ्या समस्या आहेत, त्यांच्या उच्चाटनासाठी काही उपाय असेल तर ऋषीमुनींचे वेद हाच आहे. देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री आपल्या हातामध्ये वेद घेऊन शपथ घेतील, असे स्वप्न मला पडत असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी केले. महत्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंदही उपस्थित होते. 


दिल्लीमध्ये आज आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलनाला सुरुवात झाली. यावेळी प्रथम राष्टपती रामनाथ कोविंद यांनी संबोधित केले. हा थंडीचा काळ आहे. दिल्लीमध्ये प्रदूषणामुळे श्वास गुदमरत आहे. सामाजिक संस्थांनी लोकांमध्ये सणांवेळी फटाके न जाळता शांततेत सण साजरा करण्यासाठी जनजागृती करावी असे आवाहन केले. 




यानंतर केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी भाषणावेळी वेदांची महती सांगताना केलेल्या विधानांमुळे वाद ओढवण्याची चिन्हे आहेत. देशात जेवढेकाही गुन्हे घडतात, दहशतवाद, समस्या आहेत, त्यांच्यावर एकमेव वेदच उपाय ठरणार आहेत. देशाला पुन्हा गौरवशाली व्हायचे असेल तर पुन्हा वेदच उपयोगी येतील असे सिंह यांनी सांगितले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतो तेव्हा तो बायबल या पवित्र ग्रंथ हातात घेतो. भारतातही राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री वेद हातात घेऊन शपथ घेतील, असे मी स्वप्न पाहत असल्याचे सिंह यांनी वक्तव्य केले. 



 

Web Title: crime, terrorism will vanish only by vedas : Satyapal Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.