विविध एजन्सींचे एक्झिट पोल याआधी ठरले होते खोटे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 11:00 AM2019-05-20T11:00:21+5:302019-05-20T11:33:32+5:30

२००४ आणि २००९ मधील एक्झिट पोलच्या अंदाजावर पाणी फेरले गेले होते. त्यावेळी एक्झिट पोलच्या सर्वच एजन्सीं तोंडघशी पडले होते .

The agency said that the exit polls were done in lieu of the lie | विविध एजन्सींचे एक्झिट पोल याआधी ठरले होते खोटे

विविध एजन्सींचे एक्झिट पोल याआधी ठरले होते खोटे

Next

मोसिन शेख 

मुंबई - शेवटचा टप्पा संपताच माध्यमांमध्ये विविध एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलची निरीक्षणं बाहेर येऊ लागले आहेत. प्रत्यक्षात मात्र निवडणुकीच्या निकालानंतर सर्व चित्र स्पष्ट होतील. माध्यमांमध्ये एक्झिट पोलची दिली जाणारी आकडेवारी आणि प्रत्यक्ष निकालाचे चित्र पूर्णपणे वेगळंही असू शकतं. एक्झिट पोलचे अंदाज सपशेल आपटल्याची अनेक उदाहरणे आहेत. २००९ मधील एक्झिट पोल याचा उत्तम उदाहरण ठरले आहेत. त्याव्येतिरिक्त ही अनेकदा एक्झिट पोल खोटी ठरली असल्याचे इतिहास आहे.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटचा टप्प्यात रविवारी मतदान संपताच, माध्यमांमध्ये एक्झिट पोलचा धडका सुरु आहे. आलेल्या सर्व पोलनुसार एनडीए सरकार बनवेल असे दाखवले जात आहे. तर यूपीएला पुन्हा विरोधकाच्या भूमिकेत बसण्याची वेळ येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. २०१४ ला एक्झिट पोलचे बहुतांश अंदाज खरे ठरले पण त्याआधीच्या सलग दोन लोकसभा निकालांआधी हे अंदाज सपशेल आपटले. २००४ आणि २००९ मधील एक्झिट पोलच्या अंदाजावर पाणी फेरले गेले होते. त्यावेळी एक्झिट पोलच्या सर्वच एजन्सीं तोंडघशी पडले होते .

२००४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार एनडीएला २२५ जागांवर तर यूपीएला १८३ ठिकाणी विजय मिळवता येईल असा अंदाज वर्तवला गेला होता. प्रत्यक्षात आलेला निकाल वेगळा होता. एनडीएला २२५ चा अंदाज असताना त्यांना १८९ ठिकाणी विजय मिळवता आला. भाजपला फक्त १३८ जागा मिळाल्या होत्या. यूपीएला १८३ जागांचा अंदाज एक्झिट पोलने दाखवला होता. प्रत्यक्षात, मात्र त्याच यूपीएचे २२२ खासदार निवडून आले होते. त्यामुळे २००४ मध्ये एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलचे सर्व अंदाज चुकले होते.

२००४ प्रमाणेच २००९ मधील परिस्थिती एक्झिट पोलची पहायला मिळाली होती. २००९ मधील लोकसभा निवडणुकीत एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार यूपीएला १९९ आणि एनडीएला १९७ जागांवर विजय मिळवता येईल असा अंदाज वर्तवला होता. प्रत्यक्षात यूपीएला २६२ आणि एनडीएला १५९ ठिकाणी विजय मिळवता आला होता. एक्झिट पोलच्या अंदाज यावेळी खोटा ठरला होता तर यूपीएच्या जागा प्रचंड वाढताना पहायला मिळाल्या होत्या.

२०१८ मध्ये छत्तीसगढमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सरासरी ४० जागांवर विजय मिळेल तर कॉंग्रेसचे ४६ आमदार निवडणून येतील असा अंदाज एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीतून समोर आले होते. निकाल हाती आल्यानंतर कॉंग्रेसला ६८ तर भाजपला १५ जागांवर विजय मिळवता आला होता. यावेळीही एक्झिट पोलची आकडेवारी खोटी ठरली होती. त्यामुळे २०१९ लोकसभा निवडणुकीतील एजन्सींच्या एक्झिट पोलचे आकडे कितपत खरे ठरणार हे २३ रोजीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

 

Web Title: The agency said that the exit polls were done in lieu of the lie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.