भारतीय लष्कराचा मोठा स्ट्राईक; पाकचे 12 बंकर्स उद्ध्वस्त, 5 रेंजर्संना कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 03:20 PM2019-01-17T15:20:42+5:302019-01-17T15:40:08+5:30

पाकिस्तानकडून सीमारेषेवर नेहमीच कुरापती सुरू असतात. भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याच्या या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिले.

5 Pakistani Soldiers Killed, Confirms Indian Army As India Retaliates To Ceasefire Violations | भारतीय लष्कराचा मोठा स्ट्राईक; पाकचे 12 बंकर्स उद्ध्वस्त, 5 रेंजर्संना कंठस्नान

भारतीय लष्कराचा मोठा स्ट्राईक; पाकचे 12 बंकर्स उद्ध्वस्त, 5 रेंजर्संना कंठस्नान

Next

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीर सीमारेषेवर भारतीय लष्कराने मोठी पाकिस्तानी सैन्यावर मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानच्या 5 जवानांना ठार करण्यात आलं असून पाकचे अनेक बंकर्सही उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. सर्जिकल स्ट्राईकनंतरची भारतीय लष्कराने केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. त्यामुळे याला गेल्या काही दिवसांतील मोठा स्ट्राईक असेही म्हटले जात आहे. 

पाकिस्तानकडून सीमारेषेवर नेहमीच कुरापती सुरू असतात. भारतीय लष्कराने पाकिस्तानी रेंजर्संच्या या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिले आहे. सीमारेषेवर पाकिस्तानी रेंजर्सकडून शस्त्रीसंधीचे वारंवार उल्लंघन होत होते. पाकच्या या पुळचट कारवायांना भारतीय लष्कराने चांगलेच प्रत्युत्तर दिले. पुंछ आणि राजौरी क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या पाच रेंजर्संना कंठस्नान घातले. यासोबतच पाकचे 12 बंकर्सही उद्धवस्त केले आहेत, याबाबत लष्करी कारवाईचे अधिकारी रणबीर सिंग यांनी माहिती दिली. तसेच पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यास इंडियन आर्मी नेहमीच तयार आहे, असेही सिंग यांनी म्हटले. 


 
 

Web Title: 5 Pakistani Soldiers Killed, Confirms Indian Army As India Retaliates To Ceasefire Violations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.