आजपासून मतदानवाढीचेही बिजारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 01:02 AM2019-07-01T01:02:39+5:302019-07-01T01:02:59+5:30

राज्यात १ जुलैपासून राबविण्यात येणाऱ्या वृक्षारोपण मोहिमेचे औचित्य साधून समाजामध्ये मतदान जागृतीचेदेखील बिजारोपण केले जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान जनजागृती मोहिमेवर भर दिला जाणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली.

 From today, | आजपासून मतदानवाढीचेही बिजारोपण

आजपासून मतदानवाढीचेही बिजारोपण

googlenewsNext

नाशिक : राज्यात १ जुलैपासून राबविण्यात येणाऱ्या वृक्षारोपण मोहिमेचे औचित्य साधून समाजामध्ये मतदान जागृतीचेदेखील बिजारोपण केले जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान जनजागृती मोहिमेवर भर दिला जाणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाच्या कार्यालयात उपजिल्हा निवडणूक अधिकारी आनंदकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस निवडणूक विभागाचे तहसीलदार प्रशांत पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वैशाली झनकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नितीन महाजन, मनपाचे शिक्षणाधिकारी देवीदास महाजन आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात मतदानाच्या टक्केवारी मध्ये काही प्रमाणात वाढ झाली असली तरी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हाभर जनजागृती करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या मतदान केंद्रांवर सर्वाधिक मतदान झाले, अशा मतदान केंद्रांच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच सर्वाधिक मतदान झालेल्या मतदान केंद्रांचा अभ्यास करून त्यानुसार इतर मतदान केंद्रांवर मतदान वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करावी आणि याबाबत काही अडचण असल्यास आपल्या परिसरातील मतदान केंद्राच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ यांच्याकडे संपर्क साधावा, असे अवाहन यावेळी करण्यात आले. मयत व दुबार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची मोहीम सध्या जिल्हाभर वेगाने सुरू आहे़
पथनाट्ये, रॅलीद्वारेही जनजागृती
शाळा, महाविद्यालयांत विविध कार्यक्र माद्वारे मतदारांमध्ये लोकशाही व मतदानाचे महत्त्व याबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे व मतदान वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत. पथनाट्ये, रॅलीद्वारे मतदार जागृती मोहीम घेण्यात येणार असून, भारत निवडणूक आयोग, दिल्ली यांच्या निर्देशानुसार दिव्यांग मतदारांच्या
सोयी-सुविधा याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

Web Title:  From today,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.