‘हीच वेळ आहे...’ : गेल्या वर्षी जिल्ह्यात आढळले २ हजार ९४८ क्षयरोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 05:58 PM2019-03-23T17:58:31+5:302019-03-23T18:07:48+5:30

यावर्षी जागतिक क्षयरोग दिनाचे घोषवाक्य ‘‘हीच वेळ आहे’’ असे निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये क्षयरोग निर्मूलनाचे, क्षयमुक्त जगण्यासाठी, सर्व क्षयबाधितांपर्यंत पोहचण्याची, तुम्ही क्षयबाधित आहात का? हे तपासण्यची, सर्व वैद्यकिय व्यावसायिकांपर्यंत पोहचण्याची ‘हीच वेळ आहे’.

'This is the time ...': Last year there were 2 thousand 9 48 tuberculosis in the district | ‘हीच वेळ आहे...’ : गेल्या वर्षी जिल्ह्यात आढळले २ हजार ९४८ क्षयरोगी

‘हीच वेळ आहे...’ : गेल्या वर्षी जिल्ह्यात आढळले २ हजार ९४८ क्षयरोगी

Next
ठळक मुद्दे१९५२सालापासून बी.सी.जी लसीचा उपयोग‘टी.बी’ नोटीफाईड आजार

नाशिक : जिल्ह्यातून क्षयरोग हद्दपार करण्यासाठी शासकिय यंत्रण झटत असली तरी, अद्याप यंत्रणेला फारसे यश आलेले नाही. २०१८ साली जिल्ह्यात २ हजार ९४८ क्षयरोगी आढळून आले होते. त्यापैकी २८ रुग्ण दगावले तर ९५ टक्के रुग्णांना उपचाराखाली आणण्यास यश आल्याचा दावा जिल्हा क्षयरोग कार्यालयाकडून करण्यात आला आहे.
रॉबर्ट कोच यांनी २४ मार्च १८८२साली क्षयरोगाचा शोध लावला. मायकोबॅक्टरियम ट्युबरक्युलॉसिस नावाच्या जीवाणुमळे क्षयरोगाची लागण होते. हा आजार मुख्यत: हवेमार्फत पसरतो, असा निष्कर्ष कोच यांनी संशोधनातून लावला होता. त्यामुळे २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. १९५२सालापासून बी.सी.जी लसीचा उपयोग देशात केला जाऊ लागला. क्षयरोगाच्या रुग्णांचे नवीन व पुर्नउपचार घेणारे असे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले गेले.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४५ लाख लोकसंख्येसाठी सुधारित राष्टÑीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटीमार्फत हाती घेण्यात आला आहे. या अभियानांतर्गत १६ क्षयरोग पथके, ७० मान्यताप्राप्त सुक्ष्मदर्शक केंद्र व १३८ शासकिय तथा अशासकीय आरोग्य संस्थाच्या सहकार्याने मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यात आढळून रुग्णांपैकी १हजार ५११ रूग्ण थुंकी दुषित क्षयरोगाचे तर ५७१ रु ग्ण थुंकी अदूषित क्षयरोगी आहेत. तसेच ३५८ रूग्ण हे पुनर्उपचार घेणारे व ५०८ अन्य अवयवांचे रुग्ण असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग केंद्राकडून प्राप्त झाली आहे.

‘‘हीच वेळ आहे’’
यावर्षी जागतिक क्षयरोग दिनाचे घोषवाक्य ‘‘हीच वेळ आहे’’ असे निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये क्षयरोग निर्मूलनाचे, क्षयमुक्त जगण्यासाठी, सर्व क्षयबाधितांपर्यंत पोहचण्याची, तुम्ही क्षयबाधित आहात का? हे तपासण्यची, सर्व वैद्यकिय व्यावसायिकांपर्यंत पोहचण्याची ‘हीच वेळ आहे’.

अशी आहेत क्षयरोगाची लक्षणे
दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला येणे
संध्याकाळी हलकासा ताप दररोज येणे
भूक मंदावणे, वजन कमी होणे
थुंकीतून रक्त पडणे
छातीत वेदना होणे
अशक्तपणा जाणवणे आणि रात्री घाम येणे.

‘टी.बी’ नोटीफाईड आजार
भारत सरकारने क्षयरोग (टी.बी) हा आजार ‘नोटीफायबल’ म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे शासकीय अध्यादेशानूसार सर्व खासगी वैद्यकिय व्यावसायिकांना त्यांच्याकडून निदान करण्यात आलेल्या तसेच उपचार करत असलेल्या या आजाराच्या रूग्णांची माहिती जिल्हा क्षयरोग केंद्राला विहित नमुन्यात देणे बंधनकारक आहे.

Web Title: 'This is the time ...': Last year there were 2 thousand 9 48 tuberculosis in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.