नाशिकमधील मेंटेनन्स फ्री देवराईमुळे राखले जाणार पर्यावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:40 AM2019-02-17T00:40:48+5:302019-02-17T00:42:15+5:30

सातपूर शिवारात वनविभागाच्या ४५ एकर जागेत अकरा हजार भारतीय प्रजातीची चार वर्षांपूर्वी झाडे लावली आणि ती जगवून नाशिक देवराई साकारली तर म्हसरूळ येथे सुमारे सहा हजार झाडांचे संवर्धन करून वनराई साकारली आहेत. आपलं पर्यावरण नामक संस्था स्थापन करून जिल्ह्याभरात वृक्ष लागवडीसाठी काम करीत आहेत. वृक्षप्रेमी शेखर गायकवाड यांच्याशी महापालिकेच्या देवराई प्रकल्पाबाबत केलेली बातचीत...

Maintenance of environment in Nashik Free environment will be maintained due to defection | नाशिकमधील मेंटेनन्स फ्री देवराईमुळे राखले जाणार पर्यावरण

नाशिकमधील मेंटेनन्स फ्री देवराईमुळे राखले जाणार पर्यावरण

Next
ठळक मुद्दे‘देवराई’च्या निमित्ताने शहरात पर्यावरणपूरक झाडांची लागवड होतेयबोगनवेली सारखी झाडे लावून काय उपयोग?

गेल्या २२ वर्षांपासून वृक्ष प्रेमी शेखर गायकवाड वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे काम करीत आहेत. कोणत्याही आर्थिक पाठबळाशिवाय पदरदमोड करून त्यांनी आपल्या घराच्या परीसरातील महापालिकेच्या अर्धा एकर जागेवर देवराई साकारली आहे. कोणीही वृक्ष लागवडीसाठी बोलवले की धावत जाऊन वृक्षरोपण करणाऱ्या गायकवाड यांनी सातपूर शिवारात वनविभागाच्या ४५ एकर जागेत अकरा हजार भारतीय प्रजातीची चार वर्षांपूर्वी झाडे लावली आणि ती जगवून नाशिक देवराई साकारली आहे. तर म्हसरूळ येथे सुमारे सहा हजार झाडांचे संवर्धन करून वनराई साकारली आहेत. आपलं पर्यावरण नामक संस्था स्थापन करून जिल्ह्याभरात वृक्ष लागवडीसाठी काम करीत आहेत. त्यांच्याशी महापालिकेच्या देवराई प्रकल्पाबाबत केलेली बातचीत...

प्रश्न: महापालिकेने देवराई साकारण्यास सुरूवात केली आहे. तुम्ही यापूर्वी देखील देवराई साकारली आहे. त्याबद्दल काय वाटते?
गायकवाड- नाशिक महापालिकेच्या वतीने देवराईचे संकल्पना राबविली जात आहेत ही खूपच चंगली बाब आहे. देवराईतील देशी झाडांना जास्त देखभाल करावी लागत नाही. म्हणजेच ती मेंटेनन्स फ्री असतात. तसेच ती शहराची फुफ्फुसे असतात. नाशिक मध्ये पंधरा ते सोळा वर्षांपूर्वी उपनगरला माझ्या घराच्या जवळ महापालिकेच्या अर्धा एकर जागेत मी देशी प्रजातीची झाडे लावून देवराई साकारली होती. डॉ. प्रकाश आमटे आणि राज ठाकरे यांनी देखील ही देवराई बघितली होती. त्यानंतर मी अलिकडेच महापालिकेचे उद्यान उपआयुक्त शिवाजी आमले आणि सह्याद्री देवराईकार आणि अभिनेते सयाजी शिंदे यांना दाखवून अशाच प्रकारे शहरात अन्यत्र प्रकल्प राबविता येतील असे सुचवले होते. महापालिका आता त्याचे अनुकरण करीत आहेत. याचा आनंद वाटतो.

प्रश्न: ‘देवराई’च्या निमित्ताने शहरात पर्यावरणपूरक झाडांची लागवड होतेय असे वाटते का?
गायकवाड: निश्चितच. कारण यापुर्वी म्हणजेच सुमारे दहा वर्षांपुर्वी शहरात महापालिकेने विविध रस्त्यांच्याकडेला किंवा मोकळ्या भुखंडांवर ज्या प्रजातीची लागवड केली आहे, त्यामध्ये महापालिकेकडून वृक्षप्रजाती निवड चूकीची ठरली. परदेशी प्रजातीला महत्त्व दिले गेले. परिणामी शहराच्याकडेला जरी हिरवळ नजरेस पडत असली तरी त्या झाडांचा कुठलाही फायदा पर्यावरणाला किंवा जैवविविधतेला होत नाही. उलट वादळवाºयात ही झाडे उन्मळून पडतात आणि नागरिकांच्या वाहनांने नुकसान होते. त्यानंतर दोष झाडांना दिला जातो. तसेच या झाडांची अवाढव्य व अनियंत्रित वाढ महावितरणची डोकेदुखी ठरते आणि पावसाळापुर्व छाटणीच्या नावाखाली अशास्त्रीयपध्दतीने झाडांच्या फांद्या  कर्मचा-यांकडून तोडल्या जातात. त्यामुळे झाडाची नैसर्गिक रचना बिघडते. परिणामी झाड अधिकच धोकादायक होते.
देवराई’ प्रकल्पामुळे महापालिकेकडून योग्य प्रकारची भारतीय प्रजातीची वृक्ष लागवड होत आहे. आपलं पर्यावरण संस्थेकडून याबाबत काटेकोरपणे काळजी घेत उद्यानविभागाला रोपांच्या प्रजाती सुचविल्या गेल्या आहेत. यामुळे नजीकच्या काळात शहराचे पर्यावरण संतुलन राखले जाणार असून जैवविविधताही विकसीत होण्यास मदत होणार आहे.
प्रश्न: तुमच्या देवराईचे वैशिष्ट काय आणि महापालिकेने आणखी काय केले पाहिजे..
गायकवाड: माझ्या घराजवळ साकारलेल्या देवराईत पर्याेवरण पुरक झाडे लावली आहेत. १५३ देशी प्रजातीची झाडे लावली आहेत. विदेशी गुलमोहर, रेनट्री, काशिद अशी झाहे लावण्यापेक्षा ज्यामुळे फुलपाखरे, पक्षी आणि मधमाश्या येतील अशाप्रकारची झाडे लावणे आवश्यक असते. महापालिकेने आत्ताशी त्याची सुरूवात केली आहे. परंतु आता अशाप्रकारची झाडे लावली पाहिजेत तसेच रस्त्याच्या कडेल देखील अशीच झाडे लावली पाहिजेत. महापालिकेने यापूर्वी वृक्षारोपण केले आहे परंतु त्यात अशा विदेशी झाडांचा समावेश होता. त्याच बरोबर दुभाजकात कोणती झाडे लावावी याबाबत देखील मी महापालिकेला पत्र दिले आहे. बोगनवेली सारखी झाडे लावून काय उपयोग परंतु वृक्ष लागवडीचे नियोजन असले पाहिजे.
प्रश्न: नागरीकही अनेकदा वृक्षारोपण लावतात, त्यांना काय सल्ला द्याल..
गायकवाड: नागरीक हौसेने झाडे लावतात. परंतु आपण लावलेली झाडे चुकीची असता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. जेवणात जसे वरण,भात, भाजी, चटणी, कोशींबीर आवश्यक असते. त्याप्रमाणे झाडे देखील सर्वप्रकारची असली पाहिजेत. घराच्या परीसरात थेट वडाचे झाड लावता येणार नाही परंतु सुपारी, सिल्व्हर ओक, सोन चाफा, बकुळ अशी झाडे असली पाहिजेत.
 

Web Title: Maintenance of environment in Nashik Free environment will be maintained due to defection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.