अकरावी प्रवेश प्रक्रियेत आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 04:17 PM2018-08-21T16:17:50+5:302018-08-21T16:21:44+5:30

अकरावी प्रवेशाच्या चार नियमित फेऱ्यांनतर एक विशेष फेरी पूर्ण झाले असून आतापर्यंत सुमारे १६ हजार ३४० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहे. उर्वरीत विद्यार्थ्यांसाठी आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीने प्रवेशप्रकि या राबविली जाणार असून त्यासाठी २५ आॅगस्टला रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार आतापर्यंत प्रथम पसंतीचे प्रवेश मिळणूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसह ज्यांना आतापर्यंत झालेल्या ५ फेऱ्यांमध्ये आपल्या पसंतीचे महाविद्यालय मिळू शकलेली नाही असे ८० टक्के व त्याहून अधिक गुण असलेले विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.

The first priority for the first to come in the eleventh admission process is first | अकरावी प्रवेश प्रक्रियेत आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य

अकरावी प्रवेश प्रक्रियेत आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य

Next
ठळक मुद्देअकरावी प्रवेश प्रक्रियेत पाच फेऱ्या पूर्णचार नियमित व एक विशेष फेरीत 16 हजार प्रवेश आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रधान्य पद्धतीने प्रवेश

नाशिक : अकरावी प्रवेशाच्या चार नियमित फेऱ्यांनतर एक विशेष फेरी पूर्ण झाले असून आतापर्यंत सुमारे १६ हजार ३४० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहे. उर्वरीत विद्यार्थ्यांसाठी आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीने प्रवेशप्रकि या राबविली जाणार असून त्यासाठी २५ आॅगस्टला रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार आतापर्यंत प्रथम पसंतीचे प्रवेश मिळणूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसह ज्यांना आतापर्यंत झालेल्या ५ फेऱ्यांमध्ये आपल्या पसंतीचे महाविद्यालय मिळू शकलेली नाही असे ८० टक्के व त्याहून अधिक गुण असलेले विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.
नाशिक महानगर पालिका क्षेत्रातील ५८ महाविद्यावलयांमधील सुमारे २७ हजार ९०० जागांपैकी आतापर्यंत १६ हजार ३४० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून जवळपास ११ हजार विद्यार्थी अजूनही प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहे. यात पहिल्या फेरीपासून ते पाचव्या फेरीपर्यंत प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतल्यामुळे असे विद्यार्थी प्रवेश प्रक्रितून बाद झाले होते. त्यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनाही प्रवेशापासून वंचीत राहण्याची वेळ निर्माण झाली होती. परंतु, शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेच्या नियमित चार व विशेष एक फे री पूर्ण झाल्यानंतर उर्वरीत विद्यार्थ्यांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीने प्रवेश प्र्रक्रिया सुरू केली आहे. या फेरीसाठी २५ आॅगस्टला विविध महाविद्यालयांतील रिक्त जागांची यादी जाहीर केली आहे.अकरावी प्रवेशापासून आतापर्यंत वंचीत राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत गुणवंत विद्यार्थी डावलले जावू नये यासाठी ही फेरी तीन वेगवेगळ््या टप्प्यात होणार आहे. यात २७ आॅगस्टला पहिल्या टप्या ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. २८ आॅगस्टला दुसऱ्या टप्प्यासाठी रिक्त जागांची यादी जाहीर होणार आहे. त्यानुसार २९ आॅगस्टला उपलब्ध जागांवर ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार असून  ३० आॅगस्टला तिसऱ्या टप्प्यासाठी रिक्त जागांची यादी जाहीर होणार आहे. ३१ आॅगस्टला सर्व दहावी पास विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. त्यानंतर २ सप्टेंबरला प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीच्या दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर केला जाणार आहे. 

Web Title: The first priority for the first to come in the eleventh admission process is first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.