ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:15 AM2018-03-17T00:15:20+5:302018-03-17T00:15:20+5:30

गेल्या पंधरा दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलामुळे शेतकरी पुरता त्रस्त असून, हवामान खात्याने पुढील काही दिवसात पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. मानोरी, मुखेड, सत्यगाव, देशमाने आदी परिसरात शेती मशागतीमध्ये गहू सोंगणी, कांदे, हरबरा काढणीची कामे जोरात सुरू आहेत.

Due to cloudy weather, farmers are worried | ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतित

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतित

googlenewsNext

मानोरी : गेल्या पंधरा दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलामुळे शेतकरी पुरता त्रस्त असून, हवामान खात्याने पुढील काही दिवसात पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. मानोरी, मुखेड, सत्यगाव, देशमाने आदी परिसरात शेती मशागतीमध्ये गहू सोंगणी, कांदे, हरबरा काढणीची कामे जोरात सुरू आहेत. कांदा, गहू पिकाला गेल्या दहा - बारा दिवसांपूर्वी पाण्याची गरज भासत होती. कांदा पीक पाण्याविना करपू लागले होते. त्यामुळे आवर्तनाच्या माध्यमातून पाणी मिळविण्यासाठी अनेक प्रकारची आंदोलने करत शेतकºयांनी पाणी मिळवून पिकांना जीवदान दिले. परंतु मागील तीन ते चार दिवसात हवामानात बदल होत असून, ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस पडू लागल्याने बळीराजा पुरता हतबल झाला आहे. कांदे काढून विकावे की साठवावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. आकाशातील काळ्या ढगाळ वातावरणामुळे पाऊस कधी बरसेल याचा अंदाज नाही. आधीच कमी दरात कांद्याला भाव मिळत असल्याने अशा वातावरणात अजून तोटा सहन करावा लागण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे कांदा पिकावर झालेला खर्च भरून निघण्याचीसुद्धा नामुष्की शेतकºयांवर ओढवली आहे. महागडी कीटकनाशके, रासायनिक खते, कांदे काढणीला सात हजार रुपये प्रतिएकर भाव, मजुरी आदी खर्च करून योग्य भाव मिळत नसल्याने तर शेतकºयांची तेल गेले अन् तूपही गेले अशी अवस्था झाली आहे. गव्हाची स्थिती कांद्याच्या पिकासारखी झाली आहे. गहू सोंगणीला मजूर मिळत नसल्याने अशा ढगाळ वातावरणामुळे हार्वेस्टिंग मशीनला प्राधान्य दिले जात आहे. मागील दोन दिवसांत शेतकरी त्यांच्या मागावर आहेत. एक हजार ते बाराशे रुपये प्रतिएकर मजुरी देऊनही मशीन मिळत नाही. अशात जर पावसाने धुमाकूळ घातला तर वाळलेले गव्हाचे पीक भुईसपाट होण्याच्या भीतीने शेतकरी संकटात सापडला आहे.

Web Title: Due to cloudy weather, farmers are worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.