देशवंडी येथे जलसाक्षता अभियानांर्तगत गाळ उपशाचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 06:22 PM2019-01-18T18:22:04+5:302019-01-18T18:22:39+5:30

सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे शासन, युवामित्र व टाटा ट्रस्टच्यावतीने जलसाक्षरता अभियानाद्वारे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्यासाठी ग्रामस्थांनी हे अभियान राबविण्याचा निर्धार करण्यात आला. याअंतर्गत जलसाठ्याच्या ठिकाणातील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

Determination of mud ramp under Deshvandi Mission under Swachhakshta Abhiyan | देशवंडी येथे जलसाक्षता अभियानांर्तगत गाळ उपशाचा निर्धार

देशवंडी येथे शासन, युवामित्र व टाटा ट्रस्टच्यावतीने जलसाक्षरता अभियानाद्वारे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्यासाठी ग्रामस्थांनी हे अभियान राबविण्याचा निर्धार करण्यात आला. त्याप्रसंगी ग्रामस्थ.

Next

नायगाव : सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे शासन, युवामित्र व टाटा ट्रस्टच्यावतीने जलसाक्षरता अभियानाद्वारे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्यासाठी ग्रामस्थांनी हे अभियान राबविण्याचा निर्धार करण्यात आला. याअंतर्गत जलसाठ्याच्या ठिकाणातील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
टाटा ट्रस्टच्या सहकार्याने युवा मित्र या संस्थेच्या वतीने तालुक्यातील देशवंडी येथे शेतकऱ्यांचे जलसाक्षरता अभियान राबविण्यात आले. सुनील पोटे यांच्या मार्गदर्शनाने युवा मित्र संस्थेचे तालुका समन्वयक प्रीतम लोणारे यांनी ग्रामस्थांना जलसमृद्धी प्रकल्पाद्वारे गावचा विकास कसा करता येईल याबाबत माहिती दिली. तसेच ‘गाळ मुक्त धरण, गाळ युक्त शिवार’ या योजनेअंतर्गत गावातील नदी-नाले व पाझर तलाव यातील गाळ काढण्याची मोहीम राबवून भूजलपातळीत वाढ करण्यावर भर दिला जाणार आहे. गावातील शेतकºयांनी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत मशीन मागणी अर्ज सादर करावयाचा आहे. सदरचा प्रकल्प युवा मित्र महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जाणार आहे . यासाठी संस्थेकडून यंत्रसामुग्री सरकारकडून इंधन खर्च दिला जाणार आहे . उपसलेला गाळ शेतकर्यांना मोफत मिळणार असून तो त्यांनी स्वत:च्या वाहनाने त्यांच्या शेतात घेऊन जायचा आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत नदी-नाले व पाझर तलाव खोली करणामुळे जलसाठ्यात वाढ होईल तसेच पुढे या जलसाठ्यांवर पाणी वापर संस्था स्थापन करून त्या पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन शेतकरी स्वत: करतील असे लोणारे यांनी यावेळी सांगितले
कार्यक्रमास युवा मित्र संस्थेचे सोमनाथ वाघ, वैभव आव्हाड, सरपंच वनीता कापडी, उपसरपंच सुभाष बर्के, भाऊसाहेब कापसे,बाळु कापडी, ज्ञानेश्वर नागरे, देविकसन बर्के,उत्तम कापडी, जगन चकणे, चिंधु डोमाडे, संजय कर्डक, नवनाथ बर्के, शरद कापडी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते .

Web Title: Determination of mud ramp under Deshvandi Mission under Swachhakshta Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.