बरे झाले़, निवडणुकीपूर्वीच युतीची लाचारी महाराष्ट्रासमोर आली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:49 AM2019-02-20T00:49:58+5:302019-02-20T00:53:32+5:30

साडेचार वर्षे सोबत घेतलेल्या रामदास आठवले, महादेव जानकारांचे या युतीमध्ये स्थान काय, असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा़अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला़

Well, before the election, the helplessness of the alliance came front of Maharashtra! | बरे झाले़, निवडणुकीपूर्वीच युतीची लाचारी महाराष्ट्रासमोर आली!

बरे झाले़, निवडणुकीपूर्वीच युतीची लाचारी महाराष्ट्रासमोर आली!

Next
ठळक मुद्देआठवले, जानकरांना वाऱ्यावर का सोडले?अशोक चव्हाण यांचा प्रश्न

विशाल सोनटक्के
नांदेड : साडेचार वर्षे सत्तेचा मलीदा लाटत एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहणारे सेना-भाजपा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकत्र आले. हे महाराष्ट्राच्या दृष्टीने बरेच झाले़ यानिमित्ताने या दोन्ही पक्षांची सत्तेसाठीची लाचारी जनतेसमोर आल्याचे सांगत, साडेचार वर्षे सोबत घेतलेल्या रामदास आठवले, महादेव जानकारांचे या युतीमध्ये स्थान काय, असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा़अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला़
बुधवारी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचाराची रणधुमाळी नांदेड येथून संयुक्त प्रचारसभेने सुरु होत आहे़ या पार्श्वभूमीवर खा़चव्हाण ‘लोकमत’शी बोलत होते़ चव्हाण म्हणाले, ‘मागील साडेचार वर्र्षांतील युतीच्या कारभाराबाबत महाराष्ट्रातील जनतेत संतापाची आणि फसवणूक झाल्याची भावना आहे़ खुद्द युतीतील दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांवर नाराज आहेत़ तरीही सत्तेच्या लालसेने आज ना उद्या ते एकत्रित येतील असेच वाटत होते़ निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पाठिंबा काढून घेते की काय या भीतीने सेनेच्या दारात भाजप घिरट्या घालत होती़, तर आम्ही वेगळे आहोत हे दाखविण्यासाठी शिवसेना नाणार प्रकल्प, समृद्धी महामार्गाकडे बोट दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होते़ मात्र कुठल्याही ठोस कारणाशिवाय हे दोन्ही पक्ष घाईघाईत एकत्रित आले़ युती करताना या दोघांनाही रामदास आठवले आणि महादेव जानकर यांची साधी आठवणही आली नाही़’
आंबेडकर, राजू शेट्टींकडून सकारात्मक अपेक्षा
खरे तर आम्हीच युतीअगोदर आघाडीची घोषणा केली असती, मात्र अजूनही आम्ही प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांची वाट पाहत आहोत़ मतांचे विभाजन होवू नये यासाठी समविचारी असलेल्या आंबेडकरांना चार जागा देण्याची आमची तयारी आहे़ राजू शेट्टींशीही आघाडीबाबत बोलणे सुरु आहे़ या दोघांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अद्यापही अपेक्षा असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
दिल्लीतील बैठकीनंतर उमेदवारांची यादी
काँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवारांच्या याद्या तयार आहेत़ अंतिम निर्णयासाठी त्या पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात येत आहेत़ उमेदवार यादीच्या छाननीसाठीची दिल्ली येथे पक्षश्रेष्ठींसोबत बैठक होईल़ त्यानंतर लगेचच महाराष्ट्रातील आघाडीच्या सर्व उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले़
इतर पक्षांसोबत असलेल्या आघाड्यांबाबत...
काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष काही मोजक्या जिल्ह्यांत स्थानिक पातळीवर इतर पक्षांसोबत आहेत़ अशा आघाडी तोडण्याचा निर्णय झाला आहे काय? या प्रश्नावर चव्हाण म्हणाले, ‘राज्यपातळीवर आम्ही एकत्र लढायचे निश्चित केले आहे़ जिल्हा, तालुकापातळीवर काही स्थानिक मुद्दे आहेत़ त्यामुळे एकत्रित बसून संबंधित जिल्ह्यांतील पदाधिकाºयांशी चर्चा करुन त्यानंतरच सर्वसंमतीने निर्णय घेण्यात येईल.’
आज आघाडीची भूमिका स्पष्ट करणार
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लीकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्यासह शेकापचे जयंत पाटील, रिपाइंचे जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई यांच्यासह आघाडीचे राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी बुधवारी नांदेड येथे होणाºया संयुक्त सभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेमध्येच आम्ही आघाडीची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले़

Web Title: Well, before the election, the helplessness of the alliance came front of Maharashtra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.