कंधार तालुक्यात अधिग्रहणावर नागरिकांची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:35 AM2019-05-19T00:35:24+5:302019-05-19T00:37:22+5:30

तालुक्यातील वाडी, तांड्यावर पाणीटंचाईचे तांडव निर्माण झाले असून ४० गावे, वाडी व तांड्यांतील तहान अधिग्रहण केलेल्या विहीर, विंधन विहिरीवर भागत आहे़ सध्या ६ टँकरने ५ तांडे, १ वाडी व एका गावाची तहान भागत असून शिराढोण तांडा, महादेवमाळ तांडा, गोविंद तांडा, गांधीनगर टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.

Citizens depend reserved water source | कंधार तालुक्यात अधिग्रहणावर नागरिकांची मदार

कंधार तालुक्यात अधिग्रहणावर नागरिकांची मदार

googlenewsNext
ठळक मुद्दे ४० गावांसह वाड्या-तांड्यांवर ६७ अधिग्रहणे

कंधार : तालुक्यातील वाडी, तांड्यावर पाणीटंचाईचे तांडव निर्माण झाले असून ४० गावे, वाडी व तांड्यांतील तहान अधिग्रहण केलेल्या विहीर, विंधन विहिरीवर भागत आहे़ सध्या ६ टँकरने ५ तांडे, १ वाडी व एका गावाची तहान भागत असून शिराढोण तांडा, महादेवमाळ तांडा, गोविंद तांडा, गांधीनगर टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.
तालुक्यात गतवर्षी सरासरी पर्जन्यवृष्टी झाली नाही. झालेला पाऊस अल्प व दीर्घ अंतराने झाला. त्यामुळे जलसाठे भरलेच नसल्याने टंचाईत भर पडली. त्यामुळे दुष्काळाने कहर केला आहे. टंचाई निवारण्यासाठी केलेल्या उपाययोजनाची अंमलबजावणी करताना प्रशासनाची व तसेच टँकर, अधिग्रहण आदींचे प्रस्ताव तयार करून दाखल करण्यासाठी कसरत होत असल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील ४० गावे, वाडी, तांडयाची तहान ६७ बोअर व विहीर अधिग्रहणावर भागत आहे. त्यात सर्वाधिक अधिग्रहण संख्या कुरूळा ६ आहे. आंबुलगा ५, आलेगाव १, उमरगा खो. १, कंधारेवाडी २, कौठा १, खंडगाव ह. १, गुंडा बिंडा दिंडा १, गोणार १, घोडज ३, चिखलभोसी १, जाकापूर २, तळयाचीवाडी १, दाताळा २, दिग्रस खु.२, पानशेवडी १, बामणी प.क.१, बोरी खु.१, भुत्याचीवाडी १, भेंडेवाडी १, मंगलसांगवी ३, मसलगा २, मादाळी १, मानसिंगवाडी २, मुंडेवाडी १, लाठ खु.२, वहाद १, वहादतांडा १, शिरसी बु.१, शिरूर १, संगुचीवाडी २, सावरगाव १, सावळेश्वर १, हाटक्याळ ३, हाडोळी ब्र.१, हणमंतवाडी १, हारबळ प.कं.१, हाळदा ३, हासूळ ३, हिप्परगा शहा १ अधिग्रहण संख्या आहे.
दरम्यान, याबाबत विचारले असता उपलब्ध जलसाठे मोठ्या प्रमाणात उपसले जात होते. मानार नदी, बारूळ प्रकल्प, जगतुंग समुद्र या जागी विद्युत पुरवठा चालू असताना वारेमाप उपसा केला जात होता. परंतु विद्युत वितरण, महसूल यंत्रणेकडून एकत्रित कार्यवाही केली. जगतुंग समुद्रातील १८ विद्युत मोटारी काढण्यात आल्या असून मानार प्रकल्पातील मोटारीही काढण्याची कार्यवाही केल्याची माहिती तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी ‘लोकमत’ला दिली.
विशेष दुरुस्तीची कामे संथगतीने
पाणीटंचाई दूर करण्यासाठी केलेल्या प्रस्तावित आराखड्यात तात्पुरती पूरक नळयोजना, नळयोजना विशेष दुरूस्ती उपाययोजना ३६ मंजूर झाल्या. ऐन टंचाई काळात कामे पूर्ण होऊन नागरिकांना पाणी मिळेल. याचा भरवसा राहत नाही. अंदाजपत्रक, प्रशासकीय मंजुरी, निविदा प्रक्रिया, प्रत्यक्ष कामे करणे आणि पाणीपुरवठा सुरू करणे मोठे आव्हान ठरले. यंदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने कामाची मंजुरी व निविदा प्रक्रिया लांबली असे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.

Web Title: Citizens depend reserved water source

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.