सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी की नवीन चेहरा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:15 AM2018-01-19T00:15:43+5:302018-01-19T00:19:47+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे आयोजन ९ ते ११ मार्चदरम्यान रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात करण्यात आले आहे. या सभेत संघाच्या सरकार्यवाह पदाचीदेखील निवड करण्यात येणार आहे. विद्यमान सरकार्यवाह भय्याजी जोशी हे या पदी कायम राहतात की त्यांच्याजागी इतर पदाधिकाऱ्याची वर्णी लागते हा प्रश्न अनुत्तरित आहे. लोकसभा निवडणुकांना अवघे दीड वर्ष बाकी असल्यामुळे या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Bhairaji Joshi's new face to the Chief Minister? | सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी की नवीन चेहरा ?

सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी की नवीन चेहरा ?

googlenewsNext
ठळक मुद्देसंघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा ९ मार्चपासूनसरकार्यवाहांची होणार निवडराजकीय वर्तुळाचेदेखील लागले लक्ष

योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे आयोजन ९ ते ११ मार्चदरम्यान रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात करण्यात आले आहे. या सभेत संघाच्या सरकार्यवाह पदाचीदेखील निवड करण्यात येणार आहे. विद्यमान सरकार्यवाह भय्याजी जोशी हे या पदी कायम राहतात की त्यांच्याजागी इतर पदाधिकाऱ्याची वर्णी लागते हा प्रश्न अनुत्तरित आहे. लोकसभा निवडणुकांना अवघे दीड वर्ष बाकी असल्यामुळे या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
संघाची प्रतिनिधी सभा दरवर्षी होत असते. परंतु यात दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. या सभेत सरकार्यवाह या पदाची निवड होणार आहे. देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी या निवड प्रक्रियेत सहभागी होतील. या सभेत रिक्त जागादेखील भरण्यात येतील, तसेच संघटनविषयक बाबींसह सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर प्रस्ताव संमत करण्यात येतील.
२०१२ व २०१५ मध्ये या पदावर भय्याजी जोशी यांची फेरनिवड झाली होती. संघातील सूत्रानुसार यावेळी त्यांची सलग चौथ्यांदा फेरनिवड जवळपास निश्चित मानली जात आहे. परंतु गेल्या तीन वर्षांतील संघाने घेतलेले धोरण आणि संघप्रणित संघटनांचे वाढते प्राबल्य यामुळे यंदा संघाकडून धक्का देण्यात येण्याची शक्यता आहे. तुलनेने तरुण असलेले सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, सुरेश सोनी,व्ही.भागय्या, कृष्णगोपाल यांच्या नावाचादेखील विचार होण्याची प्रबळ शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सरकार्यवाहांची निवड झाल्यानंतरच संघाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात येते. सरकार्यवाहांची निवड निवडणूक प्रक्रियेद्वारे होते. या पदासाठी आतापर्यंत एकदाही मतदान करण्याची वेळ आलेली नाही. निवड करून सरकार्यवाहांच्या नावाची घोषणा करण्यात येते. यंदादेखील असेच व्हावे असा संघाचा प्रयत्न आहे.
सरकार्यवाहच मुख्य प्रशासक
संघाच्या संविधानानुसार संघाचे सर्वोच्च अधिकारी हे सरसंघचालक नाहीत तर सरकार्यवाह हे आहेत. सरसंघचालक हे संघाचे मार्गदर्शक असतात. सरकार्यवाह हे निवडून आलेले असतात. संघाचा विस्तार, संघाची विविध कार्य इत्यादींवर सरकार्यवाह यांचे थेट लक्ष असते.

Web Title: Bhairaji Joshi's new face to the Chief Minister?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.