पावसाळ्यात सजग राहा, मुख्यालय सोडू नका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:12 AM2019-06-22T00:12:29+5:302019-06-22T00:13:16+5:30

पावसाळ्याच्या दिवसामध्ये वीज यंत्रणेत होणारे बिघाड त्वरित दुरुस्त करून ग्राहकांना दिलासा देण्याबरोबर सर्व अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून ग्राहकांची समस्या समजून तक्रारींचे तात्काळ निवारण करा, वीजपुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागणार असेल तर त्यांना याबाबत अवगत करून या दिवसात सर्वतोपरी सजग राहा, असे निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालकदिलीप घुगल यांनी दिले.

Be careful in the monsoon, do not leave the headquarters | पावसाळ्यात सजग राहा, मुख्यालय सोडू नका 

पावसाळ्यात सजग राहा, मुख्यालय सोडू नका 

Next
ठळक मुद्देप्रादेशिक संचालक दिलीप घुगल : ग्राहकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाळ्याच्या दिवसामध्ये वीज यंत्रणेत होणारे बिघाड त्वरित दुरुस्त करून ग्राहकांना दिलासा देण्याबरोबर सर्व अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून ग्राहकांची समस्या समजून तक्रारींचे तात्काळ निवारण करा, वीजपुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागणार असेल तर त्यांना याबाबत अवगत करून या दिवसात सर्वतोपरी सजग राहा, असे निर्देश महावितरणच्यानागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालकदिलीप घुगल यांनी दिले.
सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी आपापसात समन्वय साधून कंपनीचे हित जपण्यासाठी काम करावे, आपली जबाबदारी योग्यरीत्या पार न पाडणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसेस बजावून त्यांची बदली इतरत्र करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. सध्या पावसाचे व वादळवाऱ्याचे दिवस असल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यास युद्धपातळीवर सुधार कार्य हाती घेऊन शक्य तितक्या लवकर वीजपुरवठा सुरू होण्यासाठी प्रयत्नरत राहा. महसूल वसुली आणि थकबाकी यांचा सविस्तर आढावा घेतानाच वसुली कार्यक्षमता कमी असलेल्या विभागांनी सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
वितरित केलेल्या विजेची वसुली करणे व आपल्या ग्राहकांना दर्जेदार सेवा देणे ही महावितरण अधिकारी, कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दिलेली जबाबदारी झटकून चालणार नाही. अनियमितपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्याच्या स्पष्ट सूचना दिलीप घुगल यांनी दिल्या. ग्राहक सेवेत निष्काळजीपणा व कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर याआधीच कारवाई करण्यात आली आहे. पण, ही परिस्थिती अशीच पुढे चालत राहिली तर अशा कामचुकार कर्मचाऱ्यांची गय करण्यात येणार नाही व त्यांना परिमंडळाबाहेर बदली करण्याचा गर्भीत इशाराही यावेळी त्यांनी दिला. तसेच शहरांची वितरण हानी कमी करण्यासाठी वीज चोरी पकडणे, तात्काळ नवीन वीज जोडणी देणे, वीज चोरांवर गुन्हे दाखल करणे व प्रगतीपथावरील कामे वेळेत पूर्ण करण्यासोबतच त्यास दर्जेदार करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रादेशिक संचालक यांनी अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील कंत्राटदार यांचेशी संवाद साधत ग्राहक सेवेसाठी देखभाल व दुरुस्तीच्या कामाच्या निविदेला प्रतिसाद देऊन कामे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले.

Web Title: Be careful in the monsoon, do not leave the headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.