मराठी अस्मितेच्या गप्पा करणारे ‘दशक्रिये’वर गप्प का? - विखे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 06:11 PM2017-11-17T18:11:02+5:302017-11-17T18:13:44+5:30

मराठी चित्रपटांना अस्मितेचा मुद्दा करून थयथयाट करणारे ‘दशक्रिया’ चित्रपटाची मुस्कटदाबी होत असताना गप्प का, अशी संतप्त विचारणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे

Why is state government not saying a word about Dashkriya asks Vikhe Patil | मराठी अस्मितेच्या गप्पा करणारे ‘दशक्रिये’वर गप्प का? - विखे पाटील

मराठी अस्मितेच्या गप्पा करणारे ‘दशक्रिये’वर गप्प का? - विखे पाटील

googlenewsNext

मुंबई - मराठी चित्रपटांना अस्मितेचा मुद्दा करून थयथयाट करणारे ‘दशक्रिया’ चित्रपटाची मुस्कटदाबी होत असताना गप्प का, अशी संतप्त विचारणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

‘दशक्रिया’ चित्रपटाचे औरंगाबाद व पुण्यात प्रदर्शन होण्यावरून निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. साहजिकच हा चित्रपट म्हणजे एक दर्जेदार कलाकृती असणार, हे निश्चित आहे. त्यामुळे हा चित्रपट मोठ्या थाटामाटात प्रदर्शित व्हायला हवा होता. परंतु, त्याऐवजी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात पाडण्याचे काम सुरू असून, सरकार आणि सरकारमधील मराठीचे स्वयंघोषित तारणहार त्यावर चकार शब्दही काढायला तयार नाहीत. या चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये व्यत्यय येऊ शकतो, याची कल्पनाही असतानाही वेळीच पावले उचलून पुरेसा पोलीस बंदोबस्त का तैनात केला गेला नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केली.

गोवा येथे होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून ‘न्यूड’ या मराठी चित्रपटाचा खेळ तांत्रिक सबब सांगून रद्द करण्यात आला आहे. खरे तर ही तांत्रिक अडचण दूर करणे सरकारला सहज शक्य होते. परंतु, आणखी एका मराठी चित्रपटावर अन्याय होत असताना मराठी अस्मितेचे ढोंगी राखणदार मात्र निमूटपणे मूग गिळून बसल्याचा ठपका विखे पाटील यांनी ठेवला.

Web Title: Why is state government not saying a word about Dashkriya asks Vikhe Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.