भाजपाकडून सुजय विखेंचा 'जय', 'या' दोन विद्यमान खासदारांचा पत्ता कट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 08:11 PM2019-03-21T20:11:35+5:302019-03-21T20:27:42+5:30

सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील असणार आहेत.

BJP declare 16 candidate of lok sabha for maharashtra, 2 present MP cut from list, sunil gaikwad and dilip gandhi | भाजपाकडून सुजय विखेंचा 'जय', 'या' दोन विद्यमान खासदारांचा पत्ता कट

भाजपाकडून सुजय विखेंचा 'जय', 'या' दोन विद्यमान खासदारांचा पत्ता कट

googlenewsNext

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने 118 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. गतवर्षीच्या 14 उमेवारांना तिकिट देण्यात आले असून दोन खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्या दोन जागेवर नवीन उमेदवार देण्यात आले आहेत. त्यापैकी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. 

सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील असणार आहेत. तर, लातूर मतदारसंघातून सुधाकरराव शृंगारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अहमदनगरमधून खासदार दिलीप गांधी आणि लातूरमधून खासदार डॉ. सुनिल गायकवाड यांचा पत्ता कापण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता आहे. नुकतेच काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करणाऱ्या सुजय विखेंना भाजपाने तिकीट दिले आहे. लातूरमधील भाजपा गटाचे नेेते आणि ठेकेदार सुधाकरराव शृंगारे यांच्या उमेदवारीमुळे लातूर मतदारसंघात राजकीय भूकंप झाला असून सुनिल गायकवाड गटातून नाराजी व्यक्त होत आहे. 

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे लोकसभेच्या मैदानात उतरण्यासाठी दोन वर्षापासून तयारी करत होत. दोन्ही पक्षांची आघाडी झाल्यामुळे ही जागा राष्ट्रवादीकडे गेली. काँग्रेसला जागा सोडण्यास शरद पवार तयार नव्हते. त्यामुळे उमेदवारीसाठी त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले होते. विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता करण्यात आला आहे. गांधी यांची कामगिरी समाधानकारक नसल्यामुळे भाजपने सुजय यांच्या रुपाने नवा चेहरा अहमदनगरला दिला आहे. दिलीप गांधी यांनी पहिल्यांदा 1999 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार झाले. 1999 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी वेगवेगळे लढले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटीवर लढणारे माजी खासदार दादापाटील शेळके यांना २ लाख ५० हजार ५१ एवढी मते मिळाली. तर काँग्रेसच्या तिकिटावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस रिंगणात होते. त्यांना १ लाख ८८ हजार २५१ मते पडली. तर यावेळी खासदार दिलीप गांधी यांना २ लाख ७८ हजार मते मिळाली होती. 

खासदार गांधी यांचा पत्ता कट ? डॉ. सुजय विखे भाजपच्या मैदानात ?

भाजपाच्या 16 लोकसभा उमेदवारांची नावे  

महाराष्ट्र प्रदेश 

नागपूर – नितीन गडकरी

नंदुरबार – हिना गावित

धुळे – सुभाष भामरे

रावेर – रक्षा खडसे

अकोला – संजय धोत्रे

वर्धा – रामदास तडस

चिमूर-गडचिरोली – अशोक नेते

जालना – रावसाहेब दानवे

भिवंडी – कपिल पाटील

मुंबई नॉर्थ – गोपाळ शेट्टी

मुंबई नॉर्थ सेंट्रल – पूनम महाजन

नगर – सुजय विखे

बीड – डॉ. प्रीतम मुंडे

लातूर – सुधाकरराव श्रृंगारे

सांगली – संजयकाका पाटील 

चंद्रपूर - हंसराज अहिर

Web Title: BJP declare 16 candidate of lok sabha for maharashtra, 2 present MP cut from list, sunil gaikwad and dilip gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.