दुष्काळ जाहीर करण्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नाही - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 12:27 AM2018-10-10T00:27:27+5:302018-10-10T00:27:44+5:30

मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर करण्यास पंचांग पाहण्याची गरज नाही. केंद्राच्या समित्या बोलविण्याचा व पालकमंत्र्यांच्या दौऱ्यांचा फार्सही त्यांनी करु नये. शेतकरी होरपळत असल्याने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी येथे केली.

There is no need to see the almanac to declare drought - Ashok Chavan | दुष्काळ जाहीर करण्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नाही - अशोक चव्हाण

दुष्काळ जाहीर करण्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नाही - अशोक चव्हाण

Next

अहमदनगर : मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ जाहीर करण्यास पंचांग पाहण्याची गरज नाही. केंद्राच्या समित्या बोलविण्याचा व पालकमंत्र्यांच्या दौऱ्यांचा फार्सही त्यांनी करु नये. शेतकरी होरपळत असल्याने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी येथे केली.
जनसंघर्ष यात्रेनिमित्त चव्हाण जिल्ह्याच्या दौºयावर आले असता त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली़ ते म्हणाले, मुख्यमंत्री ३१ आॅक्टोबरपर्यंत दुष्काळ जाहीर करु, असे सांगत आहेत. अजून यांचे पाहणी दौरे व्हायचे आहेत. पडलेला पाऊस, धरणातील पाणीसाठे व उपलब्ध चारा याचे अहवाल असताना सरकार आणखी कशाची वाट पाहत आहे? कापसावर बोंडअळी व उसावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव आहे. शेतकºयांना विजेचे रोहित्र मिळत नाहीत़ भारनियमन सुरू आहे़ त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. जनता आता सरकारचाच ‘लोड’ कमी करण्याच्या विचारात आहे. यंत्रणेचा दुरुपयोग करुन सरकार व्यापाºयांवर छापे टाकत आहे. गुजरात निवडणुकांपूर्वीही व्यापाºयांना अशीच भीती दाखविण्यात आली. शेअर बाजार कोसळला, रुपयाचे अवमूल्यन झाले आहे. त्यामुळे सर्वच जनता त्रस्त असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत व सरचिटणीस विनायक देशमुख यावेळी त्यांच्यासमवेत होते.

निवडणुका आल्या की सेनेला राम आठवतो
राम मंदिराचा मुद्दा शिवसेनेने काढला याचा अर्थच असा की निवडणुका आल्या आहेत. निवडणूक आली की सेनेला हा मुद्दा आठवतो. भाजप-सेना एकच आहेत. ते भांडणाचा फार्स करतात. सनातन संस्था दहशती कृत्य करत आहे हे उघड झाले आहे. नव्याने समोर आलेल्या स्टिंगमधूनही ते दिसते. परंतु भाजप सरकार या संघटनेबाबत नरम धोरण घेत आहे. संजय राऊत ‘सनातन’च्या कार्यक्रमाला जाणार आहेत कारण सेनाही त्यांना पाठिशी घालते, असे चव्हाण म्हणाले.

राष्टÑवादीसोबत १२ रोजी मतदारसंघनिहाय चर्चा
राष्ट्रवादीने लोकसभेचे काही मतदारसंघ मागितले आहेत याकडे लक्ष वेधले असता चव्हाण म्हणाले, मतदारसंघ निहाय काँग्रेसची येत्या ११ तारखेला बैठक आहे. त्यानंतर राष्टÑवादीसोबत १२ आॅक्टोबरला बैठक होईल. राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय विखे राष्टÑवादीकडे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ मागत आहेत. याबाबत राष्टÑवादीसोबत अजून औपचारिक चर्चा झाली नाही. तसेच प्रकाश आंबेडकरांसोबतही बोलणी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: There is no need to see the almanac to declare drought - Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.