स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन्ही जागांवर विजय मिळणार : राजु शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 04:07 PM2019-05-21T16:07:32+5:302019-05-21T16:40:16+5:30

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता काही तास शिल्लक राहिले आहेत. २३ रोजी काय निकाल लागणार याची धाकधुक उमेदवारांना लागली आहे.

lok sabha election 2019 Raju Shetti | स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन्ही जागांवर विजय मिळणार : राजु शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन्ही जागांवर विजय मिळणार : राजु शेट्टी

Next

मुंबई - लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरवले आहे. दोन दिवसात निकाल हाती येणार असून, दोन्ही ठिकाणी आमचाच विजय होणार असल्याचा दावा खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. प्रत्यक्षात जमिनीवर जाऊन काम केले आहे. त्यामुळे आम्हाला विजयाची खात्री आहे. गतवेळच्या मताधिक्क्यांपेक्षा जास्त मताधिक्क्याने निवडून येईल, असेही शेट्टी म्हणाले. ते एका, वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.


लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता काही तास शिल्लक राहिले आहेत. २३ रोजी काय निकाल लागणार याची धाकधुक उमेदवारांना लागली आहे. दुसरीकडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन्ही उमेदवार मताधिक्क्याने विजय होणार असल्याचा दावा शेट्टी यांनी केला आहे. मतदारांच्या मनात काय आहे, हे चांगले माहीत आहे. निकालाची वाट पाहत असून मनामध्ये कसल्याही प्रकारची धाकधुक असण्याची गरज नाही. असे राजू शेट्टी म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर सांगली मतदारसंघातून विशाल पाटील तर हातकणंगलेमधून राजू शेट्टी स्वतः रिंगणात होते.


खासदार शेट्टी एक्झिट पोल बाबत बोलताना म्हणाले की, सगळीकडे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. पण काही माध्यमांमध्ये असे वृत्त जाणीवपूर्वक पसरविले जातात, जेणेकरून सट्टेबाजांना सट्टा खेळायला सोपे जावे. सट्टा घेणारे मालामाल होतील, पण सट्टा खेळणारे बरबाद होतील. याशिवाय दुसरे काही होणार नसून जो निकाल आहे, तो तसाच लागेल असा विश्वास सुद्धा यावेळी शेट्टी यांनी व्यक्त केला


 


 


 

Web Title: lok sabha election 2019 Raju Shetti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.