भाजपाकडून सत्तेचा गैरवापर, सरकारला राहुल गांधींची भीती वाटतेय - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 04:05 PM2017-11-16T16:05:58+5:302017-11-16T17:14:09+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गांधी परिवाराची पाठराखण केली आहे. सरकारला राहुल गांधींची भीती वाटायला लागली आहे.

BJP's misuse of power, government feels afraid of Rahul Gandhi - Sharad Pawar | भाजपाकडून सत्तेचा गैरवापर, सरकारला राहुल गांधींची भीती वाटतेय - शरद पवार

भाजपाकडून सत्तेचा गैरवापर, सरकारला राहुल गांधींची भीती वाटतेय - शरद पवार

Next

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गांधी परिवाराची पाठराखण केली आहे.  सरकारला राहुल गांधींची भीती वाटायला लागली आहे. त्यामुळे सरकारकडून सतत गांधी कुटुंबाची बदनामी केली जात आहे. भाजपा सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याची टीकाही शरद पवार यांनी केली आहे. 

राजीव गांधी यांच्या काळातील बंद झालेल्या प्रकरणांच्या फाईली पुन्हा उकरून काढून त्यांची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न आताचे राज्यकर्ते करीत आहेत. आता यांना राहुल गांधींची भीती वाटू लागली. त्यामुळंच जुनी प्रकरण उकरून गांधी कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहे असा आरोपही अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. सध्याचं सरकार सत्तेचा गैरवापर करत असून आकसाचे राजकारण सुरू असल्याची टीकाही पवार यांनी केली आहे. 

इंदिरा गांधी यांना तुरुंगात टाकल्यानंतर 6 महिन्यात त्यांना जनतेने पुन्हा निवडून दिलं. हा इतिहास नरेंद्र मोदी विसरले आहेत असंही पवार म्हणाले. बोफोर्स प्रकरणावरुन शरद पवारांनी सध्याच्या सरकावर तोफ डागत गांधी परिवाराचा जोरदार पाठराखण केली आहे.

Web Title: BJP's misuse of power, government feels afraid of Rahul Gandhi - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.