अमित शाह केव्हापासून पंचांगकर्ते झाले ?, शरद पवारांचा भाजपाध्यक्षांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2017 06:24 PM2017-08-20T18:24:23+5:302017-08-20T21:10:21+5:30

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 2050 पर्यंत केंद्रात भाजपाची सत्ता कायम राहील, असे विधान काल केले होते. त्याचा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला

When did Amit Shah become Panchangarkars?, Sharad Pawar's shoulder | अमित शाह केव्हापासून पंचांगकर्ते झाले ?, शरद पवारांचा भाजपाध्यक्षांना टोला

अमित शाह केव्हापासून पंचांगकर्ते झाले ?, शरद पवारांचा भाजपाध्यक्षांना टोला

googlenewsNext

कोल्हापूर, दि. 20 - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 2050 पर्यंत केंद्रात भाजपाची सत्ता कायम राहील, असे विधान काल केले होते. त्याचा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे. अमित शाह कधीपासून पंचांगकर्ते झाले?, त्यांनी भविष्य सांगण्याचा “नवा व्यवसाय’ केव्हापासून सुरू केला? असा प्रश्न उपस्थित करत पवारांनी शाहांसह भाजपावर जोरदार टीका केली आहे. अमित शाहांचे गुजरातेतील उद्योग धंदे मला माहती आहेत, मात्र पंचांग पाहून भाकितही सांगण्याचा अमित शाहांचा नवा उद्योग मला माहीत नव्हता, अशी उपरोधिक टीका शरद पवारांनी केली आहे. कोणत्याही सरकारमध्ये मंत्रिमंडळात कोणता मंत्री असावा किंवा नसावा याचा निर्णय मुख्यमंत्री घेत असतात. मात्र आता या घोषणा कोल्हापुरातून होत असल्याचा टोला शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांना हाणला आहे. ते कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच राणेंच्या भाजपा प्रवेशाला आपल्या शुभेच्छा असल्याचे पवारांनी सांगितले. राजू शेट्टी यांच्या सोबत मी संसदेत काम केलं आहे, पण इतर कोणी मला माहिती नसल्याचं सांगत सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांनी नामोल्लेख टाळला आहे. राजू शेट्टींचे लोकसभेतील काम दिसते. मात्र दुसरे (सदाभाऊ खोत) कोण माहीत नाहीत, त्यांचे योगदान काय? असे म्हणत पवारांनी सदाभाऊ खोत यांच्यावरही निशाणा साधला आहे. 
हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, तर मी त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन, अशा शब्दात माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी हवामान खात्याला पुण्यात टोला हाणला होता. त्यांनी कर्जमाफीच्या धोरणावरही टीका केली होती. जागतिक मधमाशी दिन आणि कृषी विज्ञान केंद्राच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. राज्यात पावसाने पाठ फिरवली आहे. हवामान खात्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात चार दिवसात पाऊस पडेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. हवामान खात्याचा अंदाज सातत्याने चूकत आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी खोचक टीका केली. या तज्ज्ञांचे अंदाज खरे ठरले तर ह्य त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेनह्ण असा उपरोधिक टोला मारला. तर राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतर काही बोलू शकत नाही, मात्र कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकरी समाधानाने बँकेत गेला आहे, असे चित्र मात्र राज्यात कोठे दिसले नाही.
 

Web Title: When did Amit Shah become Panchangarkars?, Sharad Pawar's shoulder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.