कोल्हापूर : अज्ञाताने चहाची टपरी पेटवली, चाळीस हजार रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 03:48 PM2018-02-21T15:48:10+5:302018-02-21T15:51:57+5:30

मार्केट यार्ड समोर असलेली चहाची टपरी मंगळवारी रात्री अज्ञाताने पेटवून दिली. त्यामध्ये टपरीमधील चाळीस हजार किंमतीचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना सोमवारी (दि. १९) मध्यरात्री घडली.

An unknown woman blew up tea, loss of forty thousand rupees | कोल्हापूर : अज्ञाताने चहाची टपरी पेटवली, चाळीस हजार रुपयांचे नुकसान

कोल्हापूर : अज्ञाताने चहाची टपरी पेटवली, चाळीस हजार रुपयांचे नुकसान

ठळक मुद्देअज्ञाताने चहाची टपरी पेटवलीचाळीस हजार रुपयांचे नुकसान

कोल्हापूर : मार्केट यार्ड समोर असलेली चहाची टपरी मंगळवारी रात्री अज्ञाताने पेटवून दिली. त्यामध्ये टपरीमधील चाळीस हजार किंमतीचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना सोमवारी (दि. १९) मध्यरात्री घडली.

गितांजली युवराज अहीरेकर (वय ३५, रा. भुईराज हौसिंग सोसायटी, मार्केट यार्ड) यांची घरची परिस्थिती बेताची आहे. पती आणि त्या गेली सहा वर्ष ते मार्केट यार्डसमोर चहागाडी चालवितात. त्यातून मिळणाऱ्या पैशातून ते आपला उदरनिर्वाह भागवितात. सोमवारी रात्री त्यांची चहागाडीला आग लागून खाक झाली. त्यामध्ये गॅस शेगडी, सिलेंडर, किराणा साहित्य होते.

सुमारे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले. अहीरेकर कुटूंबियांचा कोणाशी वाद नाही, तरीही चहागाडी पेटली कशी अशी शंका त्यांना आली. त्यांच्या समोर महालक्ष्मी मोटर्स कंपनीचे कार्यालयत आहे.

तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता रात्री पावणेबाराच्या सुमारास दूचाकीवरुन आलेल्या दोघा तरुणांनी चहागाडी पेटवून पळून गेलेचे दिसत आहे. त्यानुसार अहीरेकर यांनी शाहुपूरी पोलीसांत फिर्याद दिली. ‘त्या’ दोन तरुणांचा पोलीस शोध घेत आहेत.

 

Web Title: An unknown woman blew up tea, loss of forty thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.