...तर हे सरकार नालायक म्हणावे लागेल, कुडित्रे येथे सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 01:18 AM2017-11-25T01:18:08+5:302017-11-25T01:19:53+5:30

कोल्हापूर : कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात असणाºया शेतकºयांच्या व्यथा आजही तशाच आहेत. सरकार बदलल्यावर शेतकºयांच्या व्यथा दूर होऊन त्यांनी पिकविलेल्या मालाला हमीभाव मिळेल असे वाटत होते;

... then this government will have to be inadequate, the dizziness of the army chief Uddhav Thackeray at Kudittre | ...तर हे सरकार नालायक म्हणावे लागेल, कुडित्रे येथे सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा घणाघात

...तर हे सरकार नालायक म्हणावे लागेल, कुडित्रे येथे सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा घणाघात

Next
ठळक मुद्देशेतकºयांनी पिकविलेल्या मालाला हमीभाव मिळत नसेल तर न्याय मागणाºया शेतकºयांसह जनतेप्रती सरकारमधील मंत्र्यांनी व नेत्यांनी अशी चुकीची भाषा का वापरावी,

कोल्हापूर : कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात असणाºया शेतकºयांच्या व्यथा आजही तशाच आहेत. सरकार बदलल्यावर शेतकºयांच्या व्यथा दूर होऊन त्यांनी पिकविलेल्या मालाला हमीभाव मिळेल असे वाटत होते; परंतु तसे होत नसेल तर हे सरकार नालायक म्हणावे लागेल, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला.
कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, शिवसेना सचिव खा. विनायक राऊत, खा. गजानन किर्तीकर, ज्येष्ठ नेते दगडू सपकाळ, आमदार चंद्रदीप नरके आदी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, दिवसा वीज नाही व रात्री नियमित असेल याची खात्री नाही, हे चित्र पूर्वीच्या सरकारप्रमाणे आताही आहे. त्यामुळे बदललेले काहीच नाही. अशा अडचणींतूनही शेतकºयांनी पिकविलेल्या मालाला हमीभाव मिळत नसेल तर हे सरकार नालायक म्हणावे लागेल.
शेतकºयांसह जनतेचे प्रश्न समजावून घेण्यासाठी आपण आजपासून राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. सरकारवर टीका करणे हा उद्देश नाही तर या सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली असून त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण झाल्या की नाही? तसेच नुसत्याच केलेल्या घोषणा प्रत्यक्षात उतरल्या की नाही? हे पाहण्यासाठी आपण लोकांसमोर जात आहे. शेतकºयांकडून त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्याकडून निवेदनही स्वीकारत आहे. ही निवेदने मी उशाला घेऊन झोपणार नाही तर आवश्यकता वाटल्यास या सर्वांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांनाही भेटू.

उमेदवार बघून विधान परिषदेबाबत निर्णय घेऊ
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर निवडणूक लागली आहे. त्यात भाजपने शिवसेनेकडे सहकार्य मागितले आहे. याबाबत विचारणा केली असता भाजपकडून उभा राहणार उमेदवार पाहूनच मदत करायची की नाही? याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगून शिवसेना कुणाशी बांधील नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी आवर घातला नाही तर दरोडेखोरी वाढेल
सांगली येथे घडलेली अमानुष घटना गंभीर आहे. पोलिसांकडूनच पोलिसांची बदनामी करण्याची कृती होत असेल तर ते थांबविण्याची जबाबदारी या खात्याचे मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांची आहे. त्यांनी याला वेळीच आवर घातला नाही तर दरोडेखोरी सुरू होऊन प्रामाणिक पोलिसांवर अन्याय होईल, असे ठाकरे यांनी सांगितले.

भाजप नेत्यांनी चुकीची भाषा का वापरावी?
डांबराचा खर्च अर्धा दाखवा, खड्डे भरले नाही तर आभाळ कोसळेल काय? अशी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची वक्तव्ये तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्याकडून ऊस आंदोलनात तेल ओतून रस्त्यावर उतरणाºया शेतकºयांच्या पायात गोळ्या घालाव्यात, असे केलेले बेजबाबदार वक्तव्य हे योग्य नाही. न्याय मागणाºया शेतकºयांसह जनतेप्रती सरकारमधील मंत्र्यांनी व नेत्यांनी अशी चुकीची भाषा का वापरावी, अशी विचारणाही ठाकरे यांनी केली.

मराठा आरक्षण, राणे, मंत्रिपद विषयाला बगल
मंत्रिमंडळात नारायण राणे यांच्या समावेशाबाबतच्या प्रश्नावर हा त्यांच्या जीव-मरणाचा प्रश्न असून मला त्याच्यापेक्षा शेतकºयांचा प्रश्न महत्त्वाचा आहे, असे सांगून त्याला ठाकरे यांनी बगल दिली तर मराठा आरक्षणाबाबत आपण यापूर्वीच भूमिका स्पष्ट केल्याचे सांगून त्यावर अधिक बोलणे टाळत कोल्हापूरच्या आमदारांना मंत्रिपद मिळणार का? या प्रश्नावरही हसतच त्यांनी कोल्हापूरला एक पालकमंत्री दिला असताना इतर मंत्री कशाला? अशी कोटीही त्यांनी केली.

Web Title: ... then this government will have to be inadequate, the dizziness of the army chief Uddhav Thackeray at Kudittre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.