कदापिही भाजपात जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 05:26 AM2017-08-17T05:26:22+5:302017-08-17T05:26:24+5:30

सामान्य शेतक-यांना केंद्रबिंदू मानून आतापर्यंत वाटचाल केली.

Never will you go to BJP | कदापिही भाजपात जाणार नाही

कदापिही भाजपात जाणार नाही

googlenewsNext

कोल्हापूर : सामान्य शेतक-यांना केंद्रबिंदू मानून आतापर्यंत वाटचाल केली. पण काही मंडळींनी भाजप प्रवेशाशी नाव जोडून बदनामी करण्याचा ठेकाच घेतला असला तरी आपण भाजप प्रवेश करणार नाही, अशा शब्दांत कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजप प्रवेश चर्चेला पूर्णविराम दिला. माझ्या भाजप प्रवेशाच्या अफवा पसरवणारे सरकारमधून कधी बाहेर पडणार, याचा शोध घेणार असल्याचा टोलाही खोत यांनी ‘स्वाभिमानी’चे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांना हाणला.
शाहूवाडी येथे कृषी विभागाच्या कार्यक्रमासाठी राज्यमंत्री खोत बुधवारी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ही स्पष्टोक्ती दिली. ‘स्वाभिमानी’चे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांच्यावरही त्यानी हल्ला चढविला. सहानुभूतीसाठी आपण कधी चळवळ केली नाही. आयुष्यात कुणामध्ये फूट पाडण्याचे काम केले नाही; पण काही मंडळींनी यासाठीच आतापर्यंत काम केले, असे खोत म्हणाले. आम्ही महाराष्टÑातील शेतकºयांसाठी अनेकवेळा पदयात्रा काढल्या, पण आमच्या पायाला कधी फोड आले नाहीत. कारण आमचे वडील वारकरी होते, त्यांनी अनेक वाºया केल्या होत्या, त्यांचा वारसा मी चालवला. त्यामुळे आमचे पाय वडिर्लोजित मजबूत असल्याचा टोलाही खोत यांनी लगावला.
>दसºयाला घोषणा?
दसºयाच्या मुहूर्तावर नवीन शेतकरी संघटनेची घोषणा करण्याचे संकेतही सदाभाऊंनी दिले. महाराष्टÑातील सामान्य शेतकºयांनी माझ्यावर प्रेम केले. त्या सर्वांना विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Never will you go to BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.