युती धर्म पाळल्यास भाजप-सेनेकडे पुन्हा सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:46 AM2019-02-20T00:46:51+5:302019-02-20T00:46:55+5:30

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सध्या जिल्हा परिषदेत भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता असली तरी शिवसेनेचे पाच ...

If the alliance is to be followed, then the power of the BJP-Sena is again revived | युती धर्म पाळल्यास भाजप-सेनेकडे पुन्हा सत्ता

युती धर्म पाळल्यास भाजप-सेनेकडे पुन्हा सत्ता

Next

समीर देशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सध्या जिल्हा परिषदेत भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता असली तरी शिवसेनेचे पाच सदस्य विरोधात आहेत; काँग्रेस, राष्ट्रवादीला मानणाऱ्या पाचजणांनी भाजपचा अध्यक्ष होण्यास मदत केली आहे. अशा परिस्थितीत सध्या सत्तारूढ भाजप मित्रपक्षांकडे ६७ पैकी ३७ सदस्य असून विरोधकांकडे २८ सदस्य आहेत. भाजप-शिवसेना युतीचा निर्णय झाल्यानंतर खरोखरच जर युतीधर्म पाळला गेला तरी केवळ जनसुराज्यच्या पाठिंब्यावर पुन्हा युतीची अध्यक्ष होऊ शकतो अशी आजची स्थिती आहे. ही आकडेवारी ३५ विरोधात ३२ अशी राहणार आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल आणि महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा शौमिका महाडिक यांच्यात अध्यक्षपदासाठीची लढत होणार असताना महाडिक यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या युवक आघाडीचे दोन सदस्य, पी. एन. पाटील यांच्यावरील रागापोटी प्रकाश आवाडे यांच्या आघाडीचे दोन सदस्य आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन सदस्य राहिले. ‘जनसुराज्य’शी त्याआधीच चर्चा झाल्याने त्यांचे सहा सदस्य आणि एक अपक्ष महाडिक यांच्या पाठीशी राहिले.
शिवसेनेच्या चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, सुजित मिणचेकर आणि संजय घाटगे यांच्या सात सदस्यांनी महाडिक यांच्यासाठी भाजपला पाठिंबा दिला. तर प्रकाश आबिटकर यांच्या आघाडीचे तीन आणि उल्हास पाटील, संजय मंडलिक गटाचा प्रत्येकी एक असे पाच सदस्य राष्ट्रवादी, कॉँग्रेससोबत राहिले. यामुळे शौमिका महाडिक यांचा विजय निश्चित झाला आणि ऐनवेळी राहुल पाटील यांचे नाव माघार घेण्यात आले. बदलत्या परिस्थितीत प्रकाश आवाडे यांनी जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बदलणार असल्याची घोषणा केली आहे. अशातच लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना- भाजप युती झाल्याने जर या दोन्ही पक्षांनी मनापासून युती मनावर घेतली तर पुन्हा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याची त्यांना सप्टेंबरमध्ये संधी मिळणार आहे. परंतु त्यासाठी जनसुराज्यचे सहा सदस्यांचे पाठबळ मोलाचे ठरणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय कॉंग्रेसने ज्या ठिकाणी शिवसेना, भाजपसोबत आघाड्या केल्या आहेत, त्या विसर्जित कराव्यात असे धोरण ठरविण्यात येत आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये होणाºया नव्या अध्यक्षपदाच्या निवडीत चुरस निर्माण होणार आहे.
लोकसभेच्या विजयावरही गणिते
लोकसभा निवडणुकीमध्ये संजय मंडलिक बाजी मारणार की धनंजय महाडिक यावरही जिल्हा परिषदेच्या आगामी हालचाली अवलंबून आहेत.
या ठिकाणचा विजय जिल्ह्याच्या राजकारणालाही कलाटणी
देणारा ठरणार आहे.
आघाडी धर्म पाळल्यास अशी असेल स्थिती
भाजप, शिवसेना, जनसुराज्य
भाजप १४
जनसुराज्य ०६
ताराराणी (महाडिक) आघाडी ०३
आमदार चंद्रदीप नरके गट ०३
आमदार सत्यजित पाटील गट ०२
आमदार सुजित मिणचेकर ०१
माजी आमदार संजय घाटगे ०१
आबिटकर आघाडी, शिवसेना ०३
आमदार उल्हास पाटील ०१
संजय मंडलिक गट ०१
काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमान
काँग्रेस १४
राष्ट्रवादी ११
चंदगड (कुपेकर)आघाडी ०२
आवाडे गट ०२
स्वाभिमानी शेतकरी संघटना ०२
अपक्ष रसिका पाटील ०१

Web Title: If the alliance is to be followed, then the power of the BJP-Sena is again revived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.