बालसाहित्याने दृक्श्राव्य माध्यमात यायला हवे : लवटे, बालसाहित्य परिषद उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 11:16 AM2018-11-12T11:16:24+5:302018-11-12T11:19:25+5:30

बालसाहित्याने मुद्रित माध्यमांसह दृक्श्राव्य माध्यमात यायला हवे. जगभर या क्षेत्रात काय चालले आहे, त्याचे भान बालसाहित्यकांना हवे. हे साहित्य ९९ टक्के बालककेंद्रित आणि एका टक्का पालककेंद्रित होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी येथे केले.

Childrens should come in visual medium: Lavte, Child Society | बालसाहित्याने दृक्श्राव्य माध्यमात यायला हवे : लवटे, बालसाहित्य परिषद उत्साहात

कोल्हापुरात बालसाहित्य परिषदेमध्ये ‘आज्जोपिझ्झा’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते झाले. यावेळी डावीकडून राजीव तांबे, सावित्री जगदाळे, शिवशंकर उपासे, सुभाष विभूते उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देबालसाहित्याने दृक्श्राव्य माध्यमात यायला हवे : सुनीलकुमार लवटे बालसाहित्य परिषद उत्साहात

कोल्हापूर : बालसाहित्याने मुद्रित माध्यमांसह दृक्श्राव्य माध्यमात यायला हवे. जगभर या क्षेत्रात काय चालले आहे, त्याचे भान बालसाहित्यकांना हवे. हे साहित्य ९९ टक्के बालककेंद्रित आणि एका टक्का पालककेंद्रित होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी येथे केले.

येथील रवळनाथ हौसिंग क्रेडिट सोसायटीमध्ये आजरा येथील चैतन्य सृजन व सेवा संस्था आणि बालमित्र समूहातर्फे आयोजित बालसाहित्य परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्यांचे बीजभाषण झाले. यावेळी ज्येष्ठ बालसाहित्यिक राजीव तांबे प्रमुख उपस्थित होते.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. लवटे म्हणाले, जग, भारत, महाराष्ट्र आणि मराठी भाषा असा फेर घेत बालकांसाठी सर्व काहीचा धांडोळा घेताना जे काही हाती येते, ते खिन्न करणारे आहे. म्हणूनच भविष्यात देश आणि समाजाने बालककेंद्री विकास असे ध्येयधोरण अंगीकारले पाहिजे.

मराठीत बालसाहित्यिकांची पिढी अजून जुन्या लेखनशैलीत अडकली आहे. त्यास लेखकांसह प्रकाशक, पालक, समाज जबाबदार आहे. हे पिढीतील अंतर मिटायलाच पाहिजे. ज्येष्ठ बालसाहित्यिक तांबे म्हणाले, मराठीतील बालसाहित्य इतर भाषांमध्ये पोहोचविण्याची गरज आहे. बालसाहित्य निर्मितीत दिव्यांग, विशेष गरजा असणाऱ्या बालकांचा विचार व्हावा. महाराष्ट्र बालसाहित्य परिषदेची स्थापना व्हावी.


या कार्यक्रमात सावित्री जगदाळे लिखित ‘आज्जोपिझ्झा’, किशोर पाठक लिखित ‘टिंबाच्या कविता’ या पुस्तकांचे प्रकाशन प्रमुख उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशांत गौतम, गोविंद गोडबोले, बाळ पोतदार, प्रकाश क्षीरसागर, आदींसह महाराष्ट्र, गोव्यातील बालसाहित्यिक, लेखिका, लेखक उपस्थित होते.

‘चैतन्य सृजन’चे अध्यक्ष डॉ. शिवशंकर उपासे यांनी स्वागत केले. ते म्हणाले, बालसाहित्य एका विशिष्ट टप्प्यावर आले आहे. आता आपण नवीन शक्यतांचा विचार करायला हवा. सुभाष विभूते यांनी सूत्रसंचालन केले. सुनील सुतार यांनी आभार मानले. दरम्यान, उद्घाटनानंतरच्या सत्रात खुली चर्चा आणि पुढील कार्याचे नियोजन करण्यात आले.

ज्येष्ठ साहित्यिक लवटे म्हणाले,

  1.  वर्तमानाचा प्रश्न माध्यमांतराचा आहे. त्याचे भान बालसाहित्यात आले पाहिजे.
  2.  आपले बालसाहित्य ई-बुक्स, व्हिडीओ गेम्स, आदींच्या माध्यमातून दृश्यमय व्हायला हवे.
  3.  याचा अर्थ मुुद्रित माध्यमाला पूर्णांशाने छेद देणे नव्हे; पण बालकेंद्रित मुद्रित माध्यमांचा पुनर्विचार करणे हा आहे.


 

 

Web Title: Childrens should come in visual medium: Lavte, Child Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.