Lok Sabha Election 2019 : ३६ लाख मतदारांच्या बोटावर लागणार तब्बल ७२ लिटर शाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:17 PM2019-04-20T12:17:43+5:302019-04-20T12:18:36+5:30

११,०९८ बाटल्या जळगाव व रावेरसाठी दाखल

A total of 72 liters ink will be required for 36 lakh voters | Lok Sabha Election 2019 : ३६ लाख मतदारांच्या बोटावर लागणार तब्बल ७२ लिटर शाई

Lok Sabha Election 2019 : ३६ लाख मतदारांच्या बोटावर लागणार तब्बल ७२ लिटर शाई

Next

विजयकुमार सैतवाल
जळगाव : मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे. मतदान केल्याची खूण म्हणून मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर (बोटावर) शाई लावण्यात येते. अशा शाईच्या ३ लाख बाटल्या महाराष्ट्रात आणण्यात आल्या आहेत. त्यातील ११ हजार ९८ बाटल्या जळगाव व रावेर मतदारसंघासाठी प्राप्त झाल्या आहेत. येथील ३६ लाख ९८ हजार ४५९ मतदारांच्या तर्जनीवर मिळून जवळपास ७२ लिटर शाईचा वापर करण्यात येणार आहे.
जसजशी मतदानाची २३ एप्रिल तारीख जवळ येत आहे. तसतसे जिल्हा प्रशासनाचा निवडणूक विभाग वेगवान होत आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असणारे बहुतांश साहित्य प्रशासनाला प्राप्त झाले आहे. या असंख्य साहित्यापैकी महत्त्वाची म्हणजे शाई होय. मतदान केल्यानंतर मतदाराच्या तर्जनीवर निळी शाई लावण्यात येते. जळगाव लोकसभा मतदारसंघात १९ लाख २५ हजार ३५२ मतदार आहेत. तसेच २०१३ मतदान केंद्र आहेत. तसेच रावेर मतदार संघात १७ लाख ७३ हजार १०७ मतदार असून १९०६ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक बुथवर दोन शाईच्या बाटल्या ठेवण्यात येणार आहेत. एका बाटलीमध्ये १० मिली निळी शाई असते. या एका बाटलीमधून किमान ५०० मतदारांच्या तर्जनीवर निळ्या शाईचे निशाण लावण्यात येईल. एका मतदान केंद्रासाठी दोन बाटल्या देण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, २००४ च्या निवडणुकीवेळी मतदान करणाºया मतदाराच्या बोटावर केवळ एक ठिपका निळ्या शाईचा लावण्यात येत होता. मात्र, २००६ मध्ये निवडणूक आयोगाने ठिपक्याऐवजी सरळ रेषा आखण्याचे निर्देश दिले. त्यामुळे शाई जास्त लागत आहे.
५०० मतदारांच्या तर्जनीवर एका बाटलीमधून निळ्या शाईचे निशाण लावण्यात येईल.
कोणत्या बोटावर लागते शाई
मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. जर तर्जनीवर शाई लागलेली असेल तर त्या मतदाराला मतदान करू दिले जात नाही.
म्हैसूरची शाई
संपूर्ण देशात मतदानाच्या वेळी म्हैसूरची शाई वापरण्यात येते. येथील एका वॉर्निश कंपनीमध्ये ती तयार होते. या कंपनीपासून जगातील २५ देशांना निवडणूक शाईचा पुरवठा केला जातो. ही शाई तर्जनीवर लावल्यानंतर अजिबात पुसता येत नाही, अशी ख्याती या शाईची आहे.
१९६२च्या लोकसभा निवडणुकीत देशात सर्वप्रथम शाईचा वापर करण्यात आला होता.

Web Title: A total of 72 liters ink will be required for 36 lakh voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.