जळगाव-मुंबई विमानसेवेला जळगावकरांचा वाढता प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 04:34 PM2017-12-17T16:34:16+5:302017-12-17T16:37:12+5:30

प्रतिसादासाठी कंपन्याही सरसावल्या

Jalgaonkar's response to the Jalgaon-Mumbai flight | जळगाव-मुंबई विमानसेवेला जळगावकरांचा वाढता प्रतिसाद

जळगाव-मुंबई विमानसेवेला जळगावकरांचा वाढता प्रतिसाद

Next
ठळक मुद्दे ४ जानेवारीपर्यंतची बहुतांश तिकिटे संपली२ जानेवारीचे तिकिट ४४९९ रूपयेजैन इरिगेशनतर्फे दररोज ३ तिकिटे राखीव

जळगाव: गेल्या ७ वर्षांपासून विमानसेवेच्या प्रतीक्षेत असलेल्या जळगावकरांचा प्रत्यक्ष विमानसेवा सुरू होण्यापूर्वीच तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ४ जानेवारीपर्यंतची बहुतांश तिकीटे बुक झाली आहेत.  
सेवा पडणार तोकडी
विमान कंपन्यांना जळगावातून विमानसेवेला किती प्रतिसाद मिळेल? याबाबत साशंकता होती. उद्योजकांच्या संघटनांनी, तसेच मोठ्या उद्योग समूहांनी विमानसेवेला निश्चीत प्रतिसाद मिळेल, अशी खात्री व्यक्त केली होती. मात्र विमान कंपन्या साशंक असल्याने विमानसेवा सुरू होऊ शकली नव्हती. अखेर केंद्र शासनाच्या उडान योजनेंतर्गत जळगाव विमानतळावरून विमानसेवा देण्यास एअर डेक्कन कंपनीने तयारी दर्शविली आहे. २३ डिसेंबरपासून ही सेवा सुरू होत आहे. मात्र सेवा सुरू होण्याच्या आठवडा भर आधीच दोन आठवड्यांची तिकीटे विक्री झाली आहे. जळगावकरांचा हा प्रतिसाद पाहता ही १९ आसनी व दिवसातून एक वेळची विमानसेवा भविष्यात तोकडी पडणार आहे.
विमानसेवेला पोषक वातावरण
 जिल्'ाच्या सीमेवरच अजिंठा व वेरूळची लेणी आहेत. त्यासाठी आतापर्यंत देशभरातील तसेच परदेशी पर्यटक हे औरंगाबादपर्यंतच विमानसेवा असल्याने तेथे उतरून तेथून बसने येत असत. मात्र आता थेट विमानसेवेची सोय झाल्याने पर्यटकही जळगावच्या विमानसेवेलाच प्राधान्य देणार हे स्पष्ट आहे. याखेरीज उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ व विविध महाविद्यालयांमध्ये विविध कॉन्फरन्सच्या निमित्ताने, तर जैन हिल्स येथील गांधी तीर्थ पाहण्यासाठी देशातून तसेच परदेशातूनही लोक येतात. त्यांचेही यापुढे साहजिकच विमानसेवेला प्राधान्य राहणार आहे. याखेरीज जैन इरिगेशन, सुप्रीम इंडस्ट्रीज, रेमंड यासह अनेक मोठे उद्योगधंदे आहेत. जळगावची सुवर्णबाजारपेठ देशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे देशभरातून तसेच परदेशातूनही उद्योग-व्यवसायाच्या निमित्ताने अनेक बड्या व्यक्तींची जळगावला ये-जा सुरू असते. त्यांचेही विमानसेवेला प्राधान्य मिळणार आहे.
जैन इरिगेशनतर्फे दररोज ३ तिकिटे राखीव
विमानसेवेला बळकटीमिळेपर्यंत प्रतिसाद कायम राहण्यासाठी जैन इरिगेशन कंपनीने पुढाकार घेतला असून दररोज विमान सेवेची ३ तिकिटे कंपनीकडून खरेदी केली जाणार आहेत.
२ जानेवारीचे तिकिट ४४९९ रूपये
कंपनीकडून सुरूवातीला काही दिवस विमानसेवेला प्रतिसाद मिळावा म्हणून प्रतिव्यक्ती १४२० रूपये भाडे आकारले जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात २५०० रूपये भाडे आकारणी केली जात आहे. त्यात आता २ जानेवारी रोजी एक दिवसासाठी भाडेवाढ करण्यात आली असून प्रतीव्यक्ती ४४९९ रूपये भाडे आकारण्यात आले आहे. तरी देखील या दिवसाची केवळ ३ तिकिटे शिल्लक आहेत.

Web Title: Jalgaonkar's response to the Jalgaon-Mumbai flight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.