हलाखीच्या परिस्थितीने संघर्ष शिकवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:44 AM2018-02-24T00:44:53+5:302018-02-24T00:44:59+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत व स्वामी विवेकानंदाना आदर्श मानून काम करायला सुरुवात केली, भारत विकास गु्रपच्या (बीव्हजी) माध्यमातून लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारे हनुमंत गायकवाड आपले अनुभव सांगत होते.

Struggling with conflict situations taught | हलाखीच्या परिस्थितीने संघर्ष शिकवला

हलाखीच्या परिस्थितीने संघर्ष शिकवला

googlenewsNext
ठळक मुद्देहनुमंत गायकवाड : अंबड येथे व्याख्यानातून सांगितला राष्ट्रपती भवनापर्यंतचा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : लहानपणी आमच्या घरी वीज नव्हती. त्या वेळी ज्यांच्याघरी वीज आहे ते लोक खुप श्रीमंत असेल असे वाटायचे. हाल्लाखीच्या परिस्थितीने मला अपमान सहन करायला शिकवले. लहानपणी वडिलांसोबत एका व्याख्यानाला गेलो असता, तिथे व्याख्याते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांच्यावर व्याख्यान केले. त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत व स्वामी विवेकानंदाना आदर्श मानून काम करायला सुरुवात केली, भारत विकास गु्रपच्या (बीव्हजी) माध्यमातून लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारे हनुमंत गायकवाड आपले अनुभव सांगत होते.
येथील यशवंत व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुफण्यासाठी व्याख्याते म्हणून त्यांनी रहीमतपूर ते राष्ट्रवादी भवन या प्रवासादरम्यानचे संघर्षमय अनुभव सांगितले. यावेळी सर्व सयोजन समीतील सदस्य व शहरातील मोठया संख्येने युवक, ज्येष्ठ, महिला, युवती यांची लक्षणीय उपस्थिती होती.
गायकवाड म्हणाले, चौथीमध्ये शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे पुढील शिक्षणासाठी रहिमतपूर मधून थेट पुण्याला आलो. येथे दहावी झाल्यानंतर तंत्रनिकेतन मधून डिप्लोमा पूर्ण करत असताना आर्थिक परीस्थीती हलाखीची असल्यामुळे जॅम-सॉस विकले. पेंटींगचे काम केले. शिकवणी घेतली. १९ व्या वर्षी इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असताना मी भारत विकास ग्रुप या नावाने संस्थेची नोंदणी केली. पुण्यातील टेल्को कंपनीत नोकरीला लागलो. त्यावेळी कंपनीत अडीच कोटी रुपये किंमतीचे वायर पडून होते. त्याचा पुर्नवापर करुन मी कंपनीचे पैसे वाचवले. व्यवस्थापकीय संचालक यांनी मला बोलावून तुम्हाला काय हवे आहे, असे विचारले. मी गावाकडील मुलांना आपल्या कंपनीमध्ये नोकरी देण्याची विनंती केली. जागा नसल्याने त्यांनी स्वच्छतेसाठी जागा आहेत, तेथे काम करुन शकतात का, असे विचारले. ते काम माझ्या मित्रांनी ‘बीव्हीजी’मार्फत स्वीकारले. त्यानंतर आम्हाला अनेक कामे मिळत गेली. मी स्वप्न बघितले की, राष्ट्रपती भवनाचे काम आपल्याला मिळायळा हवे. आज हे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद व अभिवान आहे. आज राष्ट्रपतीभवन, पंतप्रधान निवास, लोकसभा, राज्यसभा केंद्र सरकारचे विविध कार्यालय तसेच मध्येप्रदेश, आंध्रप्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र व देशातील विविध राज्यात बीव्हीजीच्या माध्यमातून अतिमहत्वाची रुग्णवाहिकासेवा, पोलिसांची वाहनसेवा, स्वच्छता सेवा पुरवली जाते. बीव्हीजी इतर देशांमध्येही सेवा पुरवत आहे. आज लाखो लोक या संस्थेते काम करत आहेत. यापुढेही मला राज्यातील तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करुन द्यावयाचा असल्याचे ते म्हणाले. कोणतेही काम छोटे नसते आपल्या कामातूनच आपली वेगळी ओळख निर्माण करावी. माझ्या यशामध्ये कुटुंबीयांसोबत माझ्यासोबत काम करणाºया प्रत्येक कर्मचाºयाचा वाटा असल्याचे ते आवर्जुन म्हणाले. रामेश्वर त्रिमुखे यांनी सूत्रसंचालन केले तर अ‍ॅड. कृष्णा शर्मा यांनी आभार मानले.

Web Title: Struggling with conflict situations taught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.