विंधन विहिरींमुळे पाण्याच्या पातळीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:02 AM2019-05-25T00:02:58+5:302019-05-25T00:03:19+5:30

अत्यंत कमी वेळात कमी जागेत कमी खर्चात तयार होणाऱ्या विंधन विहिरींकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामध्ये पाण्याचे पूनर्भरण लवकर होत असल्याने पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्याचे चित्र आहे.

Decrease in water level due to fault wells | विंधन विहिरींमुळे पाण्याच्या पातळीत घट

विंधन विहिरींमुळे पाण्याच्या पातळीत घट

googlenewsNext
ठळक मुद्देविहिरींना बगल : विंधन विहिरींचे खोदकाम जोमात

लोकमत न्यूज नेटवर्क
रावणवाडी : अत्यंत कमी वेळात कमी जागेत कमी खर्चात तयार होणाऱ्या विंधन विहिरींकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामध्ये पाण्याचे पूनर्भरण लवकर होत असल्याने पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्याचे चित्र आहे.
पूर्वी पाण्याचे साधन म्हणून विहीर खोदण्याकडे नागरिकांचा अधिक भर होता. कलांतराने आता विहीर खोदण्यासाठी लागणारी मोकळी जागा, विहीर खोदल्यानंतर विहिरीतून निघणाºया मातीची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न यातूनच विंधन विहीर खोदण्याकडे नागरिकांचा कल वाढलेला दिसून येतो. विंधन विहिरीमधून निघणारे पाणी शुद्ध व आरोग्यास हानीकारक राहत नसल्याने विहिरीस पर्याय म्हणून जिल्ह्यात ठिक-ठिकाणी हातपंप खोदकामास सुरूवात झाली आहे. विहीर उभारण्यासाठी भुपृष्ठावर सुमारे ४० ते ६० फुट पर्यंत खोदकाम करावे लागते. मात्र विंधन विहीर खोदण्याकरीता फार अल्पशी जागा लागत असून त्वरीत पाण्याचा उपसा सुरू होतो.
बोअरवेलवर मोटारपंप बसवून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जात असल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पावसाळ्यात पडलेले पाणी विहिरीमध्ये थेट जमा होते. मात्र बोअरवेलचे तसे नाही पावसाचे पडलेले पाणी सहजासहजी बोअरवेलमध्ये मुरतच नाही.
पावसाचे पाणी ४० ते ५० फूटापर्यंत जिरण्यासाठी कित्येक वर्षाचा कालावधी लागतो तत्पूर्ती जमिनीतील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा झाला असल्याने पाण्याची पातळी खाली गेलेली आहे. विहिरीमधील पाणी व बोअरवेलमधील पाणी उपसा झाल्यानंतर परिसरातील पाण्याच्या पातळीवर विपरीत परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्याने बोअरवेल अधिक जास्त फूट खोदावे लागत आहे.
काही वर्षापूर्वी १५ ते २० फुटांवर वाटेल तसे मुबलक पाणी विहिरींना लागत होते. परंतु आता भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्याने विहीर खोदने फार कमी झाले आहे. तसेच हात पंपासाठी ही जास्तीत जास्त खोदावे लागत आहे. या प्रकारावर वेळीच लक्ष दिले नाही तर काही वर्षात या भागात पाण्याकरीता हाहाकार माजण्याची चिन्हे आता पासूनच दिसून येत आहे.

Web Title: Decrease in water level due to fault wells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.