नक्षलवाद्यांच्या २० वर्षात १३४ हिंसक कारवाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 10:06 PM2019-05-20T22:06:01+5:302019-05-20T22:07:13+5:30

नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात दहशतवाद्यांसारखे नक्षलवाद्यांचेही कृत्य हिंसक झाले आहेत. गोंदिया जिल्हा निर्मितीपासून आजपर्यंत २० वर्षांच्या काळात जिल्ह्यात १३४ कारवाया झाल्या आहेत.

134 violent activities in 20 years of Naxalism | नक्षलवाद्यांच्या २० वर्षात १३४ हिंसक कारवाया

नक्षलवाद्यांच्या २० वर्षात १३४ हिंसक कारवाया

Next
ठळक मुद्दे३३ सामान्य नागरिकांचाही मृत्यू : २९ चकमकीत २२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे बलिदानजागतिक दहशतवाद विरोधी दिन विशेष

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात दहशतवाद्यांसारखे नक्षलवाद्यांचेही कृत्य हिंसक झाले आहेत. गोंदिया जिल्हा निर्मितीपासून आजपर्यंत २० वर्षांच्या काळात जिल्ह्यात १३४ कारवाया झाल्या आहेत.
त्यात नक्षलवादी आणि पोलिसांच्या झालेल्या चकमकीत आतापर्यंत जिल्ह्यातील २२ अधिकारी-कर्मचारी शहीद झाले आहेत. तर ३३ सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती नक्षल विरोधी अभियान पथकाकडून मिळाली.
गोंदिया जिल्ह्याची निर्मिती १ मे १९९९ रोजी झाली. तेव्हापासून सन २०१८ च्या अखेर पर्यंत जिल्ह्यात १३४ कारवाया झाल्या आहेत. २०१२ मध्ये नक्षल्यांकडून सर्वाधीक १७ कारवाया करण्यात आल्या. त्यानंतर सन २००६ मध्ये १५ कारवाया, सन २००३ मध्ये १३, सन २०१८ व सन २००९ मध्ये प्रत्येकी १०, सन २०१० व सन २०११ मध्ये प्रत्येकी नऊ, सन २००२ मध्ये आठ, सन २००७ मध्ये सहा, सन २००१ मध्ये पाच, सन २००४, सन २०१३ व सन २०१७ मध्ये प्रत्येकी चार, सन २००८, सन २०१४ व सन २०१६ या वर्षात प्रत्येकी तीन, सन २००० व सन २०१५ या दोन्ही वर्षात प्रत्येकी दोन तर सन १९९९ मध्ये एक कारवाई करण्यात आली आहे.
आपल्या मागण्या पूर्ण करवून घेण्यासाठी बळजबरीने अत्यंत भिती दाखवून नक्षलवाद्यांकडून हिंसाचार केला जातो. जाळपोळ, अपहरण व खून केले जाते. लोकशाहीच्या विरोधात कामे करून विकासात अडथळा आणण्याचे काम केले जाते. पोलीस खबºयाच्या संशयावरून अनेकांचा खून करण्यात आला. महाराष्टÑात गडचिरोली व गोंदिया या दोन जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया पाहायला मिळतात. अवघ्या काही दिवसांपूर्वीच गडचिरोली येथे वाहनांची जाळपोळ करून पोलीस वाहनाला स्फोटाने उडविले. त्यात १५ जवान शहीद झाले. शासन गरीब आदिवासी जनतेच्या हितासाठी अनेक योजना राबविण्यासाठी पुढाकार घेत आहे.
तर विकासाच्या कामात अडथळा आणण्याचे काम नक्षलवाद्यांकडून केले जाते. नक्षलवादी व पोलीस यांच्या मधात असलेल्या आदिवासी जनतेला नेहमी दहशतीच्या सावटातच जीवन जगावे लागते. ‘हा कहे तो मॉ मरे, ना कहे तो बाप’ अशी स्थिती आजही नक्षलग्रस्त भागातील गावात आहे. मागील काही दिवसांपासून नक्षलवादी पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण करीत असल्याने नक्षल चळवळीला चांगलाच हादरा बसला आहे.
जाळपोळीच्या ३४ घटना
नक्षलवाद्यांनी केलेल्या हिंसक कारवायांचा आढावा घेतला असता आतापर्यंत २२ अधिकारी-कर्मचारी शहीद झाले. ३३ नागरिकांना प्राणास मुकावे लागले. त्यात १७ लोकांचा खून करण्यात आला. चौघांवर खुनाचा प्रयत्न करण्यात आला. लूटपाटच्या १० घटना, जबरी चोरीचे दोन गुन्हे, जाळपोळच्या ३४ घटना नमूद आहेत. २९ चकमक झाल्या असून ३८ इतर गुन्हे केले आहेत.
तंटामुक्त मोहिमेमुळे पोलिसांना मदत
आदिवासी नक्षलग्रस्त गावात नक्षलवाद्यांची माहिती काढण्यासाठी जाणाºया पोलिसांना लोक मदत करीत नसतात. पोलीस गावात गेले की नागरिक आपल्या घरची दारे बंद करतात. परंतु महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री दिवंगत आर.आर. पाटील यांनी आणलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेमुळे पोलीस व आदिवासी जनता यांच्यातील दुरावा संपला. जे आदिवासी नक्षलवाद्यांना जेवण देत होते तेच आदिवासी तंटामुक्त मोहीमेमुळे पोलिसांना माहिती देऊ लागले. त्यामुळे नक्षलवाद्यांनी या तंटामुक्त मोहिमेचा जोरदार विरोध केला. तंटामुक्त मोहीम ही आदिवासी जनता व पोलीस यांच्यात समन्वय साधणारा दुवा ठरली.
सन्मानाचे जीवन जगण्यासाठी पुढे या
नक्षल्यांचे जीवन खडतर आहे. त्यात पोलिसांच्या गोळीवर त्यांचे नाव लिहिले असून हे अमूल्य निरर्थक जाणार आहे. त्यामुळे हे जीवन सन्मानाचे जगण्यासाठी हिंसक नक्षलवादाचा मार्ग सोडून नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण योजनेचा लाभ घ्यावा.
- विनीता शाहू, पोलीस अधीक्षक गोंदिया.

Web Title: 134 violent activities in 20 years of Naxalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.