‘या’ कपल्सनी वेगळे झाल्यानंतरही घेतला नाही घटस्फोट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 06:07 AM2017-07-24T06:07:28+5:302017-07-24T06:07:28+5:30

बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत, ज्यांचे चित्रपटाच्या सेटवर सूत जमले आणि त्यांनी लग्न केले. लग्नानंतर त्यांचे नाते फार काळ काही टिकले नाही.

'These' couples did not even divorce after separation! | ‘या’ कपल्सनी वेगळे झाल्यानंतरही घेतला नाही घटस्फोट!

‘या’ कपल्सनी वेगळे झाल्यानंतरही घेतला नाही घटस्फोट!

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत, ज्यांचे चित्रपटाच्या सेटवर सूत जमले आणि त्यांनी लग्न केले. लग्नानंतर त्यांचे नाते फार काळ काही टिकले नाही. मात्र, अनेक वर्षे वेगळे राहिल्यानंतरही या जोड्यांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला नाही.
नजर टाकूया अशाच काही जोड्यांवर...


राखी-गुलजार
सत्तरच्या दशकातील आघाडीची अभिनेत्री म्हणून राखीचे नाव घेतले जायचे. राखीचा पहिला विवाह अजय बिस्वास या निर्मात्यासोबत झाला होता. लग्नाच्या काही वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर राखीच्या आयुष्यात गुलजार आले आणि त्यांच्यासोबत तिने लग्न केले. कालांतराने त्यांच्यात दुरावा निर्माण झाला जेव्हा गुलजार यांनी त्यांच्या ‘मौसम’ चित्रपटात राखीला न घेता शर्मिला टागोरला घेतले. त्याच वेळेस राखीने यश चोप्रांचा ‘कभी कभी’ चित्रपट स्वीकारला, जे गुलजारला यांना मान्य नव्हते. ते वेगळे झाले खरे, पण त्यांनी त्यांच्या मुलीच्या भवितव्यासाठी घटस्फोट घेतला नाही.



कोंकणा सेन शर्मा-रणवीर शौरी
२००७ मध्ये ‘डबल मिक्स’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेस दोघांचे सूत जुळले. त्यानंतर पुढील वर्षातच त्यांनी साखरपुडा केला आणि दोघांनी ‘लिव्ह इन’ मध्ये राहण्यास सुरुवात केली. याच दरम्यान त्यांना एक मुलगा देखील झाला. पण यांचे ही नातं फार काळ टिकले नाही. २०१३च्या सुमारास दोघे वेगळे झाल्याची बातमी मीडियामध्ये पसरली. मात्र, ही केवळ अफवा असल्याचे दोघांनी सांगितले. पण, शेवटी २०१५ मध्ये त्यांनी आपण वेगळे झाल्याचे कबूल केलेच. ते आज ही एक चांगले मित्र आहेत मागच्या वर्षी त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.

रणधीर कपूर-बबिता
सत्तरच्या दशकातील सर्वांत रोमँटिक जोड्यांपैकी एक जोडी होती रणधीर कपूर आणि बबिताची. चित्रपट ‘कल आज और कल’ च्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. कपूर घराण्याला चित्रपटात काम करणारी सून पसंत नव्हती, म्हणून रणधीर कपूर यांच्या घरातून या लग्नाला विरोध झाला. मात्र, त्यानंतरही रणधीर कपूर यांनी बबिताशीच विवाह केला. करिश्मा कपूर आणि करिना कपूर या दोन मुलींच्या जन्मानंतर दोघांच्या नात्यात दुरावा आला आणि दोघांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्षे लांब राहिल्यानंतरही त्यांनी अद्याप घटस्फोट घेतलेला नाही. नुकत्याच बबिताच्या ७०व्या वाढदिवसाला रणधीर कपूर हजर होते.





पुलकित सम्राट-श्वेता रोहिरा
पुलकितने सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिराबरोबर नोव्हेंबर २०१४ मध्ये विवाह केला. पण त्यांचे हे नातं लग्नानंतर एका वर्षातच संपुष्टात आले. त्याचे कारण होते पुलकितची सहकलाकार यामी गौतम. पुलकित आणि यामी ‘सनम रे’ च्या शूटिंगदरम्यान एकमेकांना डेट करत होते.



संगीता बिजलानी- महंमद अजहरुद्दीन
अजहरुद्दीनला पहिल्याच नजरेत संगीता आवडली होती. संगीता बिजलानी ही प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री होती. संगीतासाठी अजहरने आपला ९ वर्षांचा संसार मोडला. त्यावेळी त्याला त्याची पहिली पत्नी नौरीनपासून २ मुली ही होत्या. तरीही अजहरने १९९६ मध्ये संगीताशी विवाह केला. लग्नाच्या १५ वर्षांनंतर संगीता आणि अजहर वेगळे झाले. ज्वाला गुट्टा आणि अजहरमधली वाढत्या जवळीकीमुळे संगीता अजहरपासून लांब गेल्याचे समजतेय. मात्र, वेगळे होऊन ही दोघांनी अजूनही घटस्फोट घेतलेला नाही.

Web Title: 'These' couples did not even divorce after separation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.