हिमालय पादचारी पुलाच्या दुर्घटनेनंतरचे प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 04:22 AM2019-03-21T04:22:52+5:302019-03-21T04:23:17+5:30

मागील आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पादचारी उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळून, सायंकाळी ६ च्या सुमारास ६ नागरिकांचा मृत्यू, तर सुमारे ३१ नागरिक जखमी झाले व पुन्हा एकदा प्रशासन व मुंबईकर नागरिक जागृत झाले.

Question after the accident of Himalayas on the pedestrian bridge | हिमालय पादचारी पुलाच्या दुर्घटनेनंतरचे प्रश्न

हिमालय पादचारी पुलाच्या दुर्घटनेनंतरचे प्रश्न

Next

- कॅप्टन अजित ओढेकर 

मागील आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पादचारी उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळून, सायंकाळी ६ च्या सुमारास ६ नागरिकांचा मृत्यू, तर सुमारे ३१ नागरिक जखमी झाले व पुन्हा एकदा प्रशासन व मुंबईकर नागरिक जागृत झाले. अंधेरी एलफिन्स्टनच्या, २०१८ जुलै महिन्यातील पादचारी पूल कोसळण्याचा घटनेला तसे म्हटले तर फार काही मोठा काळ उलटला नव्हता. पण सरकारची प्रशासनावरील नसणारी पकड व महापालिकेतील लोकप्रतिनिधींची उदासीनता याला कारणीभूत आहे, असे म्हणण्यास
नक्कीच जागा आहे.
१९७० च्या दशकात, ब्रिटिश सरकारकडून धुळे नगरपालिकेला एक पत्र आले, त्यात त्यांनी म्हटले होते की, ‘धुळे  येथील पांझरा नदीवरील मुंबई- आग्रा महामागावर्् ारील दगडी पुलाला १०० वर्षे पूर्ण झाली असून, त्याचे वापरण्यायोग्य आयुष्य संपले आहे. त्यामुळे यापुढे काही
दुर्घटना घडल्यास आमचा संबंधित विभाग जबाबदार राहणार नाही.’ हे पत्र लेखकाने प्रत्यक्ष बघितले आहे. या पार्श्वभूमीवर खालील प्रश्न उपस्थित होतात -
१) महापालिकेच्या अखत्यारीत किती पूल आहेत?
२) रेल्वेच्या अखत्यारीत किती पूल आहेत?
३) सदरील पुलांच्या निर्मितीच्या वेळेसचे वापरायोग्य
आयुष्य किती होते? किती पुलांचे आयुष्य संपले आहे?
४) २०१८ मध्ये स्ट्रक्चरल आॅडिट झाल्यावर तातडीने
दुरुस्ती किंवा धोकादायक-पाडण्यायोग्य पूल, आजपर्यंत
दुरुस्त अथवा नष्ट का करण्यात आले नाहीत?
५) याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांची,
स्थानिक व राज्य पातळीवरील, अशी दोषनिश्चिती
करण्यात दिरंगाई का झाली?
६) माझ्या माहितीप्रमाणे सर्व सार्वजनिक वाहतुकीचे
पूल, कॉजवे इ. दरवर्षी प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचे
सर्व्हिसेबिलिटीबाबत रेकॉर्ड दप्तरी दाखल करण्यात येतो़
महापालिका, रेल्वे व सार्वजनिक बांधकाम खाते यांनी
वरील कारवाई करणे ही तेथील अधिकाऱ्यांची जबाबदारी
आहे.
वरील रेकॉर्ड जप्त करून त्याची तपासणी आजपर्यंत
करण्यात आली आहे का? प्रत्यक्षात काहीच न करता,
फक्त कागदी घोडे नाचविण्यात येऊन पैशाचा अपव्यय
करण्यात आलेला आहे, असेच आढळून येईल. त्यामुळे
खालील उपाय सुचवावेसे वाटतात

१) सर्व महत्त्वाच्या पुलांवर  दोन्ही बाजूंना, दखे भालदुरुस्ती वापरायोग्य (सर्व्हिसेबिलिटी) दाखला (सर्टिफिकेट) केल्याची तारीख  व पुढील केव्हा करण्यात येईल  हा मजकूर लिहिण्यात यावा व संबंधित खात्याचे नाव व फोन नंबर देण्यात यावा. उद्घाटन करणाºया पुढारी व
अधिका-यांच्या नावांपेक्षा हे जास्त उपयोगाचे आहे.

२) अंधेरी स्टेशनालगतचा पूल २०१८ जुलैमध्ये पडल्यावर वेळेची बचत लक्षात घेऊन सदरील काम आर्मी इंजिनीअर कोअरकडून २ महिन्यांत पूर्ण करून घेण्यात आले. सदरील कामाचे बिल नक्कीच आर्मीला संबंधित (रेल्वे/महापालिका) खात्याने दिले असणार? ते जाहीर करावे, म्हणजे आर्मी जर इतक्या कमी वेळात इतके उत्तम दर्जाचे काम इतक्या पैशात करू शकते, तर महानगरपालिका किंवा रेल्वेला एवढा वेळ, एवढा पैसा का लागतो, याचा अभ्यास करून उपाय सुचविता येतील व सामान्य करदात्यांच्या पैशांचा सदुपयोग होईल.
३) १३ मार्च २०१९ रोजी हिमालय पादचारी पुलाच्या स्लॅबचा एक भाग पडला. पण त्यानंतर जेसीबीच्या मदतीने सवर् पलु ावरील सिमटें चा स्लब्ॅ ा खालून माठे ्या पम््र ााणात पाडण्यात येत असल्याचे २ दिवस टीव्हीवर दाखविण्यात येत होते. पुलाचे लोखंडी स्ट्रक्चर अत्यंत मजबूत दिसत हात्े ा.े फक्त दान्े ही बाजच्ंू या गर्डरना आडव्या जाोडण्याचा पर्लिंग, ज्यांच्या आधाराने स्लॅब टाकण्यात आला होता. 
त्यापैकी काही पलिगर््ं ा गज्ं ा लागन्ू ा सडल्यान,े सिमटें स्लब्ॅ ा स्वत:च वजनाने अचानक खाली पडला असे स्पष्ट दिसत
होते. असे असताना संपूर्ण लोखंडी हेविस्ट्रक्चर गॅस
वेि ल्डग्ं ान े कापन्ू ा नष्ट करण्यात आल.े त्यापक्ष्े ाा सिमटें स्लॅबचे सपोर्ट करणारी पर्लिंग फक्त बदलून संपूर्ण
लोखंडी स्ट्रक्चरचा ढाचा पुन्हा वापरता आला असता असे वाटते. शिवाय दोन्ही साइडला पुलाची रुंदी वाढवून कमी
पैशात वाढत्या रहदारीची सोय करता येऊ शकली असती. याचा विचार व्हायला पाहिजे होता असे वाटते.  भविष्यात या सर्वाचा विचार होईल, अशी अपेक्षा करायला हवी़ असे झाले तरच पुढील काळात दुर्घटना टाळता येतील़

Web Title: Question after the accident of Himalayas on the pedestrian bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.