...अन् विनोद कांबळी चक्क सचिन तेंडुलकरच्या पाया पडला!

दोन जुन्या दोस्तांमधलं ते प्रेम मुंबईच्या क्रिकेटरसिकांना सुखावणारं आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 10:21 AM2018-03-22T10:21:03+5:302018-03-22T10:21:03+5:30

whatsapp join usJoin us
Vinod Kambli fell on Tendulkar's foundations | ...अन् विनोद कांबळी चक्क सचिन तेंडुलकरच्या पाया पडला!

...अन् विनोद कांबळी चक्क सचिन तेंडुलकरच्या पाया पडला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई: एकेकाळी एकमेकांचे जिवलग मित्र असणा-या सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीमधील दुरावा कमी झाला असून पुन्हा एकदा मैत्रीचे वारे वाहू लागले आहेत. काल मुंबईमधील एका लीग क्रिकेटमधील सामन्यादरम्यान याची प्रचिती आली आहे. 

मुंबईतील संघाचा मेण्टॉर या नात्यानं पदक स्वीकारण्यासाठी विनोद कांबळी व्यासपीठावर आला, त्यावेळी सुनील गावस्कर यांनी सचिन तेंडुलकर ते पदक विनोदच्या गळ्यात घालेल अशी तजवीज केली. सचिनकडून सदर पदक स्वीकारताच विनोद कांबळीने चटकन खाली वाकून त्याला नमस्कार केला. मग सचिननं विनोदला वर उठवून आलिंगन दिलं. दोन जुन्या दोस्तांमधलं ते प्रेम मुंबईच्या क्रिकेटरसिकांना सुखावणारं होतं. 

गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत 'आमच्यात सर्व काही ठीक आहे. यासाठी मी आनंदी आहे. आम्ही एकमेकांची गळाभेट घेतली आणि बातचीत केली' असं विनोद कांबळीने सांगितलं होतं. 

क्रिकेटच्या विश्वातील उगवते तारे म्हणून सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीकडे पाहिलं जात होतं. एकाचवेळी आपल्या करिअरला सुरुवात करणा-या दोघांचा शेवट मात्र वेगळा झाला. सचिन तेंडुलकर एक महान खेळाडू म्हणून उदयाला आला, तर विनोद कांबळीचं करिअर मात्र अयशस्वी ठरलं. दोघांच्या मैत्रीत फूट पडण्यास कारणीभूत ठरला तो एक टीव्ही शो. 2009 रोजी एका टीव्ही शोमध्ये विनोद कांबळीने केलेल्या वक्तव्यामुळे दोघांच्या मैत्रीत फूट पडली होती.  या शोमध्ये विनोद कांबळीने सचिनने आपल्याला क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास मदत केली नाही असं म्हणत खळबळ माजवली होती. विनोद कांबळीचं हे वक्तव्य सचिनला आवडलं नाही, आणि दोघांमध्ये अंतर आलं. 2013 रोजी जेव्हा सचिनने 200 वा कसोटी सामना खेळल्यानंतर आपली निवृत्ती जाहीर केली, त्यावेळी वानखेडे स्टेडिअममध्ये दिलेल्या भाषणात सचिनने आपल्या करिअरमध्ये वाटा असणा-या सर्वांचं नाव घेतलं पण विनोद कांबळीचा उल्लेख केला नव्हता. सचिन आणि विनोद कांबळी एकत्र शिकले. इतकंच नाही तर रमाकांत आचरेकर हेच दोघांचे कोच होते. त्यांनीच दोघांनी क्रिकेटचे धडे दिले. मुंबई आणि टीम इंडियासाठी दोघेही एकत्र खेळले. शालेय क्रिकेटदरम्यान दोघांनी नॉट आऊट 664 धावांची भागीदारी करण्याचा रेकॉर्ड केला होता.  

Web Title: Vinod Kambli fell on Tendulkar's foundations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.