यंदाच्या रणजी मोसमातील मुंबईचा  पहिला विजय, यजमान ओडिशाचा १२० धावांनी केला पराभव

गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर बलाढ्य मुंबईने यंदाच्या रणजी स्पर्धेतील पहिला विजय मिळवताना ओडीशाचा १२० धावांनी पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2017 06:10 PM2017-11-04T18:10:33+5:302017-11-04T18:10:53+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai's first win in this year's Ranji Trophy, hosts Odisha by 120 runs | यंदाच्या रणजी मोसमातील मुंबईचा  पहिला विजय, यजमान ओडिशाचा १२० धावांनी केला पराभव

यंदाच्या रणजी मोसमातील मुंबईचा  पहिला विजय, यजमान ओडिशाचा १२० धावांनी केला पराभव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई - गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर बलाढ्य मुंबईने यंदाच्या रणजी स्पर्धेतील पहिला विजय मिळवताना ओडीशाचा १२० धावांनी पराभव केला. ४१३ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ओडिशाचा डाव २९२ धावांमध्ये गुंडाळून मुंबईकरांनी बाजी मारली. दुस-या डावात मोक्याच्यावेळी सिध्देश लाडने झळकावलेले शतक मुंबईच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरले. पहिल्या डावात मोक्याच्यावेळी शतक ठोकून मुंबईला सावरणा-या युवा पृथ्वी शॉ याला सामनावीर म्हणून निवडले. 

भुवनेश्वर येथील केआयआयटी मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी मिळाल्यानंतर २८९ धावांची मजल मारली. यानंतर यजमानांचा डाव १४५ धावांत गुंडाळून मुंबईने १४४ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. दुस-या डावात मात्र मुंबईचा डाव ६ बाद ८५ धावा असा अडचणीत असताना सिध्देशने १५३ चेंडूत ११७ धावांची निर्णायक खेळी केली आणि मुंबईने आपला दुसरा डाव ९ बाद २६८ धावांवर घोषित करुन ओडिशाला विजयासाठी ४१३ धावांचे कठीण आव्हान दिले. 

तिस-याच दिवशी मुंबईने यजमानांची ४ बाद ९३ धावा अशी अवस्था करुन आपला विजय निश्चित केला होता. दुसºया डावात ओडिशाला सुरुवातीलाच धक्का देत मुंबईकरांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. धवल कुलकर्णी, शार्दुल ठाकूर आणि आकाश पारकर यांनी भेदक मारा करत यजमानांची केविलवाणी अवस्था केली होती. ४ बाद ९३ धावसख्येवरुन चौथ्या दिवसाची सुरुवात करणाºया ओडिशाचे उर्वरीत फलंदाज  पुढील १९९ धावांत बाद झाले. धवल कुलकर्णी आणि आकाश पारकर यांनी प्रत्येकी ३ बळी, तर अभिषेक नायरने २ बळी घेतले. ओडिशाकडून कर्णधार गोविंदा पोद्दार याने सर्वाधिक १२३ चेंडूत ८७ धावांची खेळी करत संघाचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. मधल्या फळीतील शांतनू मिश्रानेही (४९) चांगली फलंदाजी केली.  

संक्षिप्त धावफलक :
मुंबई (पहिला डाव) : ९९.५ षटकात सर्वबाद २८९ धावा.
ओडिशा (पहिला डाव) : ५०.५ षटकात सर्वबाद १४५ धावा.
मुंबई (दुसरा डाव) : ७१ षटकात ९ बाद २६८ धावा (घोषित)
ओडिशा (दुसरा डाव) : ८५.१ षटकात सर्वबाद २९२ धावा (गोविंदा पोद्दार ८७, शांतनू मिश्रा ४९; आकाश पारकर ३/४०, धवल कुलकर्णी ३/७४; अभिषेक नायर २/३५.)

आता ऐतिहासिक सामना...
या विजयासह ‘क’ गटामध्ये १० गुणांसह तिसºया स्थानी झेप घेतलेल्या मुंबईचा पुढील सामना बडोदाविरुध्द घरच्या मैदानावर ९ ते १२ नोव्हेंबरदरम्यान खेळविण्यात येईल. दखल घेण्याची बाब म्हणजे बडोद्याविरुद्ध होणारा सामना हा मुंबईचा ५००वा रणजी सामना असल्याने या लढतीला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. 

Web Title: Mumbai's first win in this year's Ranji Trophy, hosts Odisha by 120 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.