आयसीसी वर्ल्डकप 2019 : वर्ल्डकपमध्ये युवराजसारखा कोणीच नाही

सध्याच्या भारतीय संघात युवराज नसला तरी त्याचा विक्रम मात्र अजूनही अबाधित आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 07:50 PM2019-05-26T19:50:53+5:302019-05-26T19:51:36+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: There is no one like Yuvraj singh in World Cup | आयसीसी वर्ल्डकप 2019 : वर्ल्डकपमध्ये युवराजसारखा कोणीच नाही

आयसीसी वर्ल्डकप 2019 : वर्ल्डकपमध्ये युवराजसारखा कोणीच नाही

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारतीय संघ इंग्लंडमध्ये 'मिशन वर्ल्डकप'साठी दाखल झाला आहे. भारताने यापूर्वी २०११ साली वर्ल्डकप जिंकला होता आणि विश्वविजयाचा हिरो ठरला होता तो युवराज सिंग. पण सध्याच्या भारतीय संघात युवराज नसला तरी त्याचा विक्रम मात्र अजूनही अबाधित आहे.

युवराजने २०११ साली झालेल्या वर्ल्डकपमध्ये भारतासाठी सिंहाचा वाटा उचलला होता. या वर्ल्डकपमध्ये युवराजने अष्टपैलू कामगिरी केली होती आणि वर्ल्डकपमधला सर्वोत्तम खेळाडूही तोच ठरला होता. फलंदाजीबरोबर गोलंदाजीमध्येही त्याने चमक दाखवली होती. या वर्ल्डकपमध्ये त्याने रचलेला विक्रम अजून कोणत्याही भारतीय खेळाडूला मोडता आलेला नाही.

वर्ल्डकपमध्ये भारताकडून एकाही फिरकीपटूला पाच विकेट्स मिळवता आलेल्या नाहीत. युवराजने हा पराक्रम २०११ साली झालेल्या वर्ल्डकपमध्ये केला होता. युवराजने आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात १० षटकांमध्ये ३१ धावा देत पाच विकेट्स मिळवले होते. त्याचबरोबर या सामन्यात युवराजने अर्धशतकी खेळीही साकारली होती. त्यानंतर मात्र एकाही फिरकीपटूला भारताकडून वर्ल्डकपमध्ये पाच विकेट्स मिळवता आलेल्या नाहीत.

भारताकडून वर्ल्डकपमध्ये पहिली सेंच्युरी कोणाची, आहे का उत्तर...
भारत आतापर्यंत झालेल्या अकरा वर्ल्डकपमध्ये खेळला आहे. आता बाराव्या वर्ल्डकपसाठी भारत सज्ज झाला आहे. बऱ्याच विक्रमांची चाहत्यांना आतुरता असेल. पण वर्ल्डकपध्ये भारताकडून पहिली सेंच्युरी कोणी केली, हे तुम्हाला माहिती नसेल. त्यासाठी जाणून घ्या...

वर्ल्डकपला १९७५ साली सुरुवात झाली. हा वर्ल्डकप इंग्लंडमध्ये खेळला गेला. या वर्ल्डकपमध्ये बाजी मारली ती वेस्ट इंडिजने. या पहिल्या वर्ल्डकपमध्ये भारताला एकही सेंच्युरी झळकावता आली नाही. त्यानंतर दुसरा वर्ल्डकप १९७९ साली झाला. या विश्वचषकातही वेस्ट इंडिजने जेतेपद पटकावले. पण या वर्ल्डकपमध्येही भारताकडून एकाही फलंदाजाला शतक पूर्ण करता आले नाही.

पहिल्या दोन्ही वर्ल्डकपमध्ये भारताकडून एकही सेंच्युरी पाहायला मिळाली नाही. पण तिसऱ्या वर्ल्डकपमध्ये भारताने इतिहास रचला. १९८३ साली झालेल्या या वर्ल्डकपमध्ये भारताने अंतिम फेरीत वेस्ट इंडिजवर विजय मिळवत इतिहास रचला. याच वर्ल्डकपमध्ये भारताकडून पहिली सेंच्युरी पाहायला मिळाली.

भारताविरुद्ध पाकिस्तान रचणार इतिहास
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर साऱ्या क्रिकेट जगताचे लक्ष असते. पण आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये झालेल्या एकाही सामन्यात पाकिस्तानला भारतावर मात करता आलेली नाही. पण यावेळी मात्र इतिहास बदलणार असल्याचे संकेत पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने दिले आहेत. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान भारताला पराभूत करेल, अशी आशा इंझमामने व्यक्त केली आहे.

वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आतापर्यंत सहा सामने खेळवले गेले आहेत. पण या सहा पैकी एकाही सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागलेला नाही. त्यामुळे आतापर्यंतचा वर्ल्डकप रेकॉर्ड भारताला कायम ठेवता येतो का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्द इंझमाम म्हणाला की, " भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मॅचेस्टला सामना होणार आहे. आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारताला एकदाही पराभूत केलेले नाही. पण या वर्ल्डकपमध्ये मात्र रेकॉर्ड ब्रेक होऊ शकतो. लोकांना या सामन्याबाबत उत्सुकता आहे. मला अशी आशा आहे की, यावेळी पाकिस्तानचा संघ इतिहास रचू शकतो."

Web Title: ICC World Cup 2019: There is no one like Yuvraj singh in World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.