ICC World Cup 2019 : पाकिस्तानच्या 'या' चाहत्याला धोनी देतो प्रत्येक सामन्याचे तिकीट

पण हा चाहता नेमका कोण, ते जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 07:37 PM2019-06-14T19:37:56+5:302019-06-14T19:39:40+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: MS Dhoni gives tickets to each and every match to Pakistan's fan | ICC World Cup 2019 : पाकिस्तानच्या 'या' चाहत्याला धोनी देतो प्रत्येक सामन्याचे तिकीट

ICC World Cup 2019 : पाकिस्तानच्या 'या' चाहत्याला धोनी देतो प्रत्येक सामन्याचे तिकीट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. पाकिस्तान :  : भारत आणि पाकिस्तान पारंपरिक शत्रू. पण क्रिकेट हा खेळ या दोन देशांना जवळ आणतो, असे म्हटले जाते. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचेच उदाहरण घ्या ना, धोनी पाकिस्तानच्या एका चाहत्याला सामन्याची तिकीटे देत असल्याचे आता पुढे आले आहे. पण हा चाहता नेमका कोण, ते जाणून घ्या...

धोनीला हा चाहता भेटला २०११च्या विश्वचषकात. या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना मोहालीला झाला होता. या सामन्यानंतर धोनी आणि या चाहत्याची भेट झाली. त्यानंतर धोनी आणि या चाहत्याचे नातं अधिक दृढ होत गेले. या सामन्यानंतर धोनी आपल्याला तिकीट देत असल्याचे या चाहत्याने सांगितले आहे.

हा चाहता पाकिस्तानचा असला तरी तो अमेरिकेमध्ये राहतो. शिकागो येथे या चाहत्याचे एक हॉटेल आहे. आता रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी हा चाहता तब्बल सहा हजार किमी.चा प्रवास करून मँचेस्टरला दाखल होणार आहे. या सामन्याचे तिकीटही धोनीने या चाहत्याला दिले आहे.

या चाहत्याने सांगितले की, " धोनी आणि माझी भेट २०११ साली झालेल्या विश्वचषकात झाली. त्यानंतर आमचे संबंध चांगले राहिले आणि सुधारत गेले. धोनी हा फार व्यस्त असतो.त्यामुळे मी त्याला फोन करत नाही. मी फक्त त्याला मेसेज करतो. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे तिकीटही धोनीने मला दिले आहे."

 

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा पाकिस्तानचा चाहता नेमका आहे तरी कोण? तर या चाहत्याचे नाव आहे मोहम्मद बशीर. पाकिस्तानातील कराची येथे बशिर यांचा जन्म झाला. त्यानंतर बशिर हे अमेरिकेतील शिकागो येथे हॉटेल व्यवसाय करत आहेत.

भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकीटाची किंमत ऐकाल तर हैराण व्हाल...
आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे ते भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महासंग्रमावर. हा सामना मँचेस्टर येथे होणरा आहे आणि आतापासूनच तिकिटांचा काळाबाजार सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या काळाबाजारात फक्त एका तिकीटाच किंमत ऐकाल तर तुमच्या पायाखालची जमिन सरकल्याशिवाय राहणार नाही.

आतापर्यंत विश्वचषकात झालेल्या सामन्यांमध्ये भारताला एकदाही पाकिस्तानकडून पराभूत व्हावे लागलेले नाही. विश्वचषकातील सर्वच सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यात नक्की काय घडते, भारत विजयाची परंपरा कायम राखणार की पाकिस्तान पराभवाची मालिका खंडीत करणार, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.

भारत आणि न्यूझीलंड हा सामना पावसामुळे वाया गेला. पण यावेळी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली समालोचन करत होता. त्यावेळी त्याने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या तिकीटांचा एक किस्सा सांगितला. गांगुली म्हणाला की, " भारत आणि पाकिस्तान सामन्याची क्रेझ काही वेगळीच असते. रविवारी होणाऱ्या सामन्याच्या तिकीटांची मी एका व्यक्तीला किंमत विचारली. त्यावर त्याने मला जो आकडा सांगितला, ते ऐकून मी चकितच झालो. भारत आणि पाकिस्तान सामन्याचे एक तिकीट सध्याच्या घडीला १५०० पाऊंडला (१, ३५, ००० रुपये) मिळत आहे."

पाकचा सामना कसा कराल, 'विराट'सेनेसाठी तेंडुलकरचा मास्टर प्लान
पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामना रद्द झाल्यानंतर सर्वांचे लक्ष रविवारच्या लढतीकडे लागले आहे. येत्या रविवारी भारत आणि पाकिस्तान हे पक्के शेजारी अन् कट्टर वैरी समोरासमोर येणार आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेत या प्रतिस्पर्धींचा सामना पाहण्याची संधी कोणीच दवडू इच्छित नाही. या महत्त्वाच्या सामन्यासाठी महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं भारतीय संघाला एक मास्टर प्लान दिला आहे.
रविवारच्या सामन्यात मोहम्मद आमीर आणि वाहब रियाज हे गोलंदाज भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरतील असे मत, 2011च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य असलेल्या तेंडुलकरनं व्यक्त केले आहे. तो म्हणाला,''भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली हे सर्वाधिक अनुभवी फलंदाज आहेत आणि पाकिस्तानने त्यांच्याविरोधात नक्की रणनीती तयार केली असेल. आमीर व रियाज हे दोघंही रोहित व विराटची विकेट घेण्यासाठी प्रयत्न करतील, परंतु त्याचवेळी रोहित व विराट त्यांचा सामना करण्यासाठी सज्ज असतील. माझा सल्ला असा आहे की अन्य खेळाडूंनी त्यांना साथ द्यावी.'' 
आमीरनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पाच विकेट घेत विक्रमी कामगिरी केली. तेंडुलकरनं आमीरच्या गोलंदाजीचे कौतुक केले. ''ऑस्ट्रेलियाविरुद्ध आमीरचा पहिला स्पेल अचूक होता. अॅरोन फिंचची त्यानं  तारांबळ उडवली होती. त्याचा सामना करताना भारतीयांनी सकारात्मक दृष्टीकोनानं खेळावं. त्याच्याविरोधात काहीही वेगळं करण्याची गरज नाही. संयम बाळगा,'' असे तेंडुलकर म्हणाला.

Web Title: ICC World Cup 2019: MS Dhoni gives tickets to each and every match to Pakistan's fan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.