टीम इंडियाला मोठा धक्का, हा सलामीवीर फलंदाज पहिल्या तीन सामन्यातून बाहेर

रविवारपासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 03:36 PM2017-09-14T15:36:27+5:302017-09-14T15:40:55+5:30

whatsapp join usJoin us
A big blow to Team India, this opener turned out of the first three games | टीम इंडियाला मोठा धक्का, हा सलामीवीर फलंदाज पहिल्या तीन सामन्यातून बाहेर

टीम इंडियाला मोठा धक्का, हा सलामीवीर फलंदाज पहिल्या तीन सामन्यातून बाहेर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई, दि. 14 - रविवारपासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या पहिल्या तीन सामन्यातून बाहेर पडला आहे. 17सप्टेंबरपासून या पाच सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे.

आपल्या पत्नीची प्रकृती ठीक नसल्याकारणाने शिखर धवनने बीसीसीआयकडे आपल्याला पहिल्या तीन सामान्यांसाठी मुक्त करण्याची विनंती केली. ती बीसीसीआयने मंजूर केली आहे. सलामीवीरांना बॅकअप म्हणून सध्या संघात केएल राहुल आणि अजिंक्य रहाणे हे खेळाडू आधीपासूनच आहेत. शिखर धवनच्या जागी संघात नवीन खेळाडूला संधी दिली जाणार नसल्याचं बीसीसीआयकडून कळवण्यात आले आहे. त्यामुळे रहाणे किंवा राहुल यापैकी एका खेळाडूला पहिल्या सामन्यात रोहित शर्मा बरोबर सलामीला संधी मिळणार आहे.

श्रीलंका दौऱ्यातही आईची प्रकृती ठीक नसल्याकारणाने शिखरने शेवटच्या दोन सामन्यात माघार घेतली होती.

चेपॉकवर ३० वर्षांनंतर लढणार भारत-ऑस्ट्रेलिया
सध्याच्या मालिकेतील पहिला सामना चेपॉकवर 17 सप्टेंबरला खेळला जाईल. उभय संघांत ३० वर्षांनंतर येथे वन-डे लढत खेळली जाईल. याआधी ९ ऑक्टोबर १९८७ मध्ये उभय संघ वन-डे खेळले. चेपॉक मैदानावर झालेला तो पहिलाच आंतरराष्ट्रीय वन-डे होता.
आतापर्यंत एकूण २० वन-डे या मैदानावर खेळविण्यात आले; पण भारत-ऑस्ट्रेलिया संघ कधीही परस्परांपुढे आले नव्हते. ऑस्ट्रेलियाने तेव्हापासून या मैदानावर झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडविरुद्ध तीन वन-डे खेळले. भारताने या मैदानावर एकूण ११ सामने खेळले. त्यापैकी सहा जिंकले, तर चार सामन्यांत पराभव पत्करावा लागला. एका सामन्याचा निकाल लागला नव्हता. भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान ९ ऑक्टोबर १९८७ मध्ये रिलायन्स विश्वचषकाचा सामना झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आधी फलंदाजी करीत जेफ मार्शच्या शतकी खेळीच्या बळावर (११० धावा) ५० षटकांत ६ बाद २७० धावा उभारल्या. के. श्रीकांत (७०) आणि नवज्योत सिद्धू (७३) यांच्या अर्धशतकांमुळे भारत विजयाच्या दारात होता. तथापि, अखेरचे सात फलंदाज ४० धावांत गमावल्याने सामना अवघ्या एका धावेने गमवावा लागला.
ऑस्ट्रेलियाने नंतर या मैदानावर सर्वच सामने सहजपणे जिंकले. याचा अर्थ या मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या यशाचा रेकॉर्ड १०० टक्के आहे. १९९६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध या संघाने अखेरचा वन-डे खेळला होता.
भारत-ऑस्ट्रेलियाने चेपॉकवर चार कसोटी सामने खेळले. त्यापैकी तीन सामने भारताने जिंकले. एक सामना बरोबरीत सुटला. भारताने १९९८, २००१ आणि २०१३ मध्ये विजय नोंदविले, तर २००४ मध्ये झालेला सामना बरोबरीत राहिला.

आकडेवारी काय सांगते...?
९ आॅक्टोबर १९८७ मध्ये उभय संघ वन-डे खेळले चेपॉक मैदानावर झालेला तो पहिलाच आंतरराष्ट्रीय वन-डे होता
20 चेपॉकवर एकूण २० वन-डेचे आयोजन
30 भारत-ऑस्ट्रेलिया ३० वर्षांनंतर प्रथमच आमने-सामने
11 भारताने येथे ११ सामने खेळले, सहा जिंकले
04 ऑस्ट्रेलियाने चार सामने खेळले, चारही जिंकले

भारत-आॅस्ट्रेलिया वन डे रेकॉर्ड
कोलकाता : सध्याच्या मालिकेत ईडन गार्डनवर २१ सप्टेंबर रोजी दुसरी वन-डे होईल. १८ नोव्हेंबर २००३ नंतर दोन्ही संघ दुस-यांदा समोरासमोर येत आहेत. त्या सामन्यात आॅस्ट्रेलियाने ३७ धावांनी बाजी मारली होती.

इंदूर : २४ सप्टेंबर रोजी होळकर स्टेडियमवर उभय संघांदरम्यान होणारा हा पहिलाच सामना असेल. आॅस्ट्रेलिया संघ शहरात प्रथमच येत आहे.

बंगळुरू : चिन्नास्वामी स्टेडियमवर २८ सप्टेंबर रोजी चौथी वन-डे होईल. या मैदानावर उभय संघांदरम्यान सहा सामने खेळले गेले. त्यापैकी भारताने चार आणि आॅस्ट्रेलियाने एक सामना जिंकला. एका सामन्याचा निकाल लागला नव्हता. २०१३ ला झालेला अखेरचा सामना भारताने ५७ धावांनी जिंकला होता.

नागपूर : पाचवा आणि अखेरचा सामना व्हीसीए जामठा स्टेडियमवर १ आॅक्टोबर रोजी खेळला जाईल. गेल्या आठ वर्षांत उभय संघ दोनदा एकमेकांविरुद्ध खेळले. दोन्ही वेळा ऑस्ट्रेलियासाठी व्हीसीएची खेळपट्टी कर्दनकाळ ठरली. भारताने २००९ मध्ये ९९ धावांनी तसेच २०१३ मध्ये सहा गड्यांंनी विजय साजरा केला. या सामन्यात धवन आणि कोहली यांनी शतके झळकविली होती. भारताने ३५१ धावांचे लक्ष्य अखेरच्या षटकात गाठले होते.

Web Title: A big blow to Team India, this opener turned out of the first three games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.