विश्वचषकाच्या अंतिम फेरीत अजून एक सुपर ओव्हर खेळवायला हवी होती, सांगतोय सचिन तेंडुलकर

इंग्लंडच्या संघाला चौकारांच्या जोरावर विजयी ठरवण्यात आले. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले होते. पण आयसीसीचा हा नियम महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला मात्र पटलेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 09:03 PM2019-07-16T21:03:52+5:302019-07-16T21:04:20+5:30

whatsapp join usJoin us
Another Super Over should be played in the World Cup final, telling Sachin Tendulkar | विश्वचषकाच्या अंतिम फेरीत अजून एक सुपर ओव्हर खेळवायला हवी होती, सांगतोय सचिन तेंडुलकर

विश्वचषकाच्या अंतिम फेरीत अजून एक सुपर ओव्हर खेळवायला हवी होती, सांगतोय सचिन तेंडुलकर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लॉर्ड्स, आयसीसीवर्ल्ड कप 2019 : विश्वचषकातील अंतिम फेरीचा सामना टाय झाला होता. त्यानंतर खेळवण्यात येणारी सुपर ओव्हरही टाय झाली होती. त्यावेळी इंग्लंडच्या संघाला चौकारांच्या जोरावर विजयी ठरवण्यात आले. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले होते. पण आयसीसीचा हा नियम महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला मात्र पटलेला नाही.

तेंडुलकरने '100एमबी'शी बोलताना सांगितले की, " विश्वचषकाची अंतिम फेरी ही फार प्रतिष्ठेची असते. त्यामुळे या सामन्याचा निकाल चौकारांच्या जोराव लावला जाणे चुकीचे आहे. जर एक सुपर ओव्हर टाय होते तर त्यानंतर दुसरी सुपर ओव्हर खेळवायला हवी होती. फुटबॉलमध्ये जसा सामना टाय झाल्यावर अतिरीक्त वेळ दिला जातो, तसे क्रिकेटमध्येही व्हायला हवे."

सचिन तेंडुलकरने दिली आपल्या गुरुंना मानवंदना, शेअर केला खास फोटो
मुंबई : भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आपल्या गुरुंना मानवंदना दिली आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. हे औचित्य साधून सचिनने आपल्या गुरुंचे स्मरण केले आहे. सचिन सध्या भारतामध्ये नसल्याचे म्हटले जात आहे. कारण सचिन इंग्लंडमध्ये विश्वचषकासाठी गेला होता. सचिनने विश्वचषकात समालोचनही केले होते. त्याचबरोबर विश्वचषकाच्या अंतिम फेरीनंतर खेळाडूंना सचिनच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला होता.

सचिन मुंबईत नसला आणि फार मोठा सन्मान त्याला विश्वचषकात मिळाला असला तरी सचिन आपल्या गुरुंना विसरला नाही. सचिन महान क्रिकेटपटू म्हणून नावारुपाला आला. पण त्याला क्रिकेटचे धडे दिले ते रमाकांत आचरेकर यांनी. काही महिन्यांपूर्वी आचरेकर यांचे निधन झाले होते. त्यावेळी सचिनही त्यांच्या अंत्यदर्शनाला उपस्थित होता. पण आचरेकर सर या जगात नसतानाही त्यांची आठवण सचिनने आजच्या खास दिवशी काढली आहे. सचिनने एक ट्विट केले असून यामध्ये त्याने आचरेकर सरांबरोबरचा खास फोटो शेअर केला आहे.
भारतीयांनो निराश होऊ नका, पुढचा विश्वचषक तुमचाच...
मुंबई : इंग्लंडमधील विश्वचषकात भारताचा उपांत्य फेरीत पराभव झाला. या पराभवाने भारतीय चाहते निराश झाले आहेत. पण भारताच्या चाहत्यंना आता निराश होण्याची गरज नाही. कारण आगामी विश्वचषक भारताचाच असेल, असे म्हटले जात आहे. यामागे काही समीकरणं असल्याचेही म्हटले जात आहे.

पहिले तीन विश्वचषक अनुक्रमे १९७५, १९७९ आणि १९८३ साली इंग्लंडमध्ये खेळवण्यात आले होते. भारताने १९८३ साली विश्वचषक जिंकला आणि त्यांना पहिल्यांदा यजमानपद देण्यात आले. त्यामुळेच १९८७ साली भारताने विश्वचषकाचे आयोजन केले होते. त्यानंतर १९९२ साली ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषकाचे आयोजन केले होते. कारण १९८७ साली ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकला होता. १९९२ साली पाकिस्तानने विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर १९९६ साली भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याकडे विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होतो. १९९६ साली झालेला विश्वचषक श्रीलंकेने जिंकला होता. पण त्यानंतर १९९९, २००३ आणि २००७ हे तिन्ही विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकले होते. पण २०११चा विश्वचषक भारताने जिंकला होता. त्यानंतर २०१५ साली झालेला विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. आणि आता इंग्लंडने २०१९ साली झालेल्या विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते.

भारतीय संघ २०११ साली झालेल्या विश्वचषकाचा सहयजमान होता. २०११चा विश्वचषक भारतानेच जिंकला होता. २०१५ साली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये विश्वचषक खेळवला गेला होता. हा विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. २०१९ साली झालेला विश्वचषक हा इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवला गेला. हा विश्वचषक इंग्लंडने जिंकला. आता आगामी विश्वचषक भारतामध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे २०२३ झालेला विश्वचषक भारतीय संघ जिंकेल, असे काही जणांना वाटत आहे.

भारताला न्यूझीलंडने उपांत्य फेरीत पराभूत केले होते, पण तरीही अंतिम फेरीत भारताने न्यूझीलंडला पाठिंबा दिला होता. पण असे असले तरी भारतीय संघ विश्वचषक कधी जिंकणार, हा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे. त्यामुळेच आता त्यांची चिंता मिटणार असल्याचे म्हटले जात असून आगामी विश्वचषक भारताचा असल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: Another Super Over should be played in the World Cup final, telling Sachin Tendulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.