सासु-सुनांच्या नात्याबद्दल दिला सामाजिक संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 10:26 PM2018-05-27T22:26:12+5:302018-05-27T22:26:12+5:30

जन्माला येईल ते उत्तमच असत, त्याची जपणूक मात्र महत्त्वाची असते. त्यातल्या त्यात नाते तर जपलेच पाहिजे. पण दुर्दैवाने आज नात्यामध्ये दुरावा निर्माण होत आहे. संवेदना बोथट झाल्या आहेत.

Social message about the relationship of Sasu-Suna | सासु-सुनांच्या नात्याबद्दल दिला सामाजिक संदेश

सासु-सुनांच्या नात्याबद्दल दिला सामाजिक संदेश

Next
ठळक मुद्देसासु-सासऱ्यांनी एकमेकांना भरविला सगुण घास : चिरादेवी येथे अनोखा लग्न सोहळा

सचिन सरपटवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : जन्माला येईल ते उत्तमच असत, त्याची जपणूक मात्र महत्त्वाची असते. त्यातल्या त्यात नाते तर जपलेच पाहिजे. पण दुर्दैवाने आज नात्यामध्ये दुरावा निर्माण होत आहे. संवेदना बोथट झाल्या आहेत. कुटुंबामधील सासु-सुनांच ‘सख्य’ तर सर्वश्रृत आहे. परंतु, सुनांनी घडवून आणलेल्या सासु-सासºयांच्या लग्न सोहळ्याने एक अनोखा अनुभव चिरादेवी वासीयांना अनुभवायला मिळाला. सासु-सुनांच नात कस असाव, हा सामाजिक संदेश या लग्न सोहळ्यातून देण्यात आला. लग्नाप्रसंगी सासु-सासºयांनी एकमेकांना भरवलेल्या सगुण घासाचा प्रसंग तर खरच आनंददायी ठरला. सोबतच नात्यांची सुंदरता समोर आली.
भद्रावती तालुक्यातील चिरादेवी येथील हनुमान ठाकरे (६८) व रेवता हनुमान ठाकरे (६०) यांच्या लग्नाचा ४५ वा वाढदिवस साजरा करण्याचे कुटुंबाने ठरवले. या कार्याची जबाबदारी त्यांच्या दोन सुनांनी घेतली. त्याला त्यांच्या दोन मुलींचेही सहकार्य लाभले. हयात असताना सासु-सासºयांना आनंद द्यावा, या भावनेतून लग्नाच्या वाढदिवशी त्यांचे पुन्हा लग्न लावायचे ठरले. रितीरिवाज, रूढी, परंपरेनुसार हा अनोखा लग्नसोहळा पार पडला. यामधून सासु-सासºयांच्या प्रती सुनांचे असलेले आदर व प्रेम व्यक्त झाले.
लग्नाचे सर्व सोपस्कार करण्यात आले. आदल्या दिवशी मेहंदीचा तर दुसºया दिवशी हळदीचा कार्यक्रम पार पडला. वधु-वरांना बाशिंग बांधण्यात आले. वराला हनुमान मंदिरापर्यंत नेवून परिसरातून मिरवणूक सुद्धा काढण्यात आली. लग्न सोहळ्यात मंगलाष्टके झालीत. हळदीच्या वेळेस वर-वधूच्या मागे नातू व नातीला त्यांचे आईवडील म्हणून बसविण्यात आले. दुप्पटा ेनातवांनी पकडला. संपूर्ण चिरादेवी गावाला जेवणाच आमंत्रण देण्यात आले होते. जयश्री वासुदेव ठाकरे व लक्ष्मी मोहन ठाकरे या दोन्ही सुनांनी सासु-सासºयांच्या या लग्न सोहळ्याची संकल्पना पुढे आणली. मंदा श्रीकृष्ण वरखडे व रंजना दिलीप सूर या ठाकरे कुटुंबियांच्या मुलींनी या कार्याला सहकार्य केले.

या लग्नसोहळ्याची माहिती आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत नव्हती. आमच्या सुना व मुलींनी हा आगळावेगळा सोहळा घडवून आणला. आमच्या सुना म्हणजे आमच्या मुलीच आहे. सासु-सुनांच नात प्रत्येक कुटुंबात असच राहो, हीच आमची अपेक्षा आहे.
- हनुमान ठाकरे, रेवता ठाकरे
रा. चिरादेवी

Web Title: Social message about the relationship of Sasu-Suna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.