‘भारत’च्या टीजरमधून कॅटरिना कैफ का झाली बाद?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 04:22 PM2019-01-25T16:22:40+5:302019-01-26T09:30:02+5:30

भाईजानच्या ‘भारत’चा टीजर सुपरहिट झाला आहे. टीजरमधील सलमानच्या पाच वेगवेगळ्या लूक्सचीही प्रचंड चर्चा आहे. अर्थात कॅटरिना कैफचे चाहते मात्र काहीसे हिरमुसलेत.

why there were no traces of katrina kaif in the teaser of bharat | ‘भारत’च्या टीजरमधून कॅटरिना कैफ का झाली बाद?

‘भारत’च्या टीजरमधून कॅटरिना कैफ का झाली बाद?

googlenewsNext
ठळक मुद्दे‘भारत’ हा चित्रपट ‘आॅड टू माई फादर’ या कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.  यात सलमान २० ते ६० वयाचे अनेक टप्पे साकारताना दिसणार आहे. 

अखेर सलमान खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘भारत’चा टीजर लॉन्च झाला. सध्या हा टीजर पाहून भाईजानचे चाहते जाम सुखावले आहेत. सोशल मीडियावर अगदी काही तासात भाईजानच्या या चित्रपटाचा टीजर सुपरहिट झाला आहे. टीजरमधील सलमानच्या पाच वेगवेगळ्या लूक्सचीही प्रचंड चर्चा आहे. अर्थात कॅटरिना कैफचे चाहते मात्र काहीसे हिरमुसलेत. याचे कारण म्हणजे, या टीजरमध्ये कॅटरिना कुठेही नाही. 
‘भारत’मध्ये सलमान व कॅटरिना लीड रोलमध्ये आहेत. या जोडीचे असंख्य चाहते आहे. अशात या जोडीची एक झलक टीजरमध्ये दिसेल, अशी अपेक्षा चाहत्यांना होती. पण कॅटरिना टीजरमध्ये अगदी सेकंदापुरतीही दिसत नाही. असे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला असतांना आता या प्रश्नाचे उत्तरही मिळाले आहे.


होय, सूत्रांचे मानाल तर, ‘भारत’मध्ये कॅटरिना एका महत्त्वपूर्ण रोलमध्ये आहे. अद्याप चित्रपट रिलीज व्हायला जवळपास ६ महिन्यांचा कालावधी आहे आणि त्यामुळे मेकर्सनी कॅटरिनाचे लूक तूर्तास सीक्रेट ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. टीजरमध्ये केवळ आणि केवळ सलमानला फोकस करायचे, हा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात आला आणि त्यामुळे कॅटरिनाला टीजरमधून बाद करण्यात आले. अर्थात पुढच्या टीजरमध्ये वा ट्रेलरमध्ये कॅटरिना व सलमान एकत्र दिसतील, हे अगदी पक्के आहे. साहजिकच कॅटरिनाच्या चाहत्यांनी निराश व्हायचे कारण नाही. 
‘भारत’ हा चित्रपट ‘आॅड टू माई फादर’ या कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.  यात सलमान २० ते ६० वयाचे अनेक टप्पे साकारताना दिसणार आहे.  म्हणजेच सलमानचे वेगवेगळे लूक्स प्रेक्षकांना पाहता येणार आहेत़  प्राप्त माहितीनुसार, सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल. यातले एक लूक मॉडर्न असेल. याकाळात त्याला कॅटरिना व त्याचे प्रेम होईल आणि नंतर लग्न.   

Web Title: why there were no traces of katrina kaif in the teaser of bharat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.