मलायका अरोरावरून झालेले भांडण विसरून सलमान खान आणि अर्जुन कपूर या चित्रपटासाठी येतायेत एकत्र?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 03:39 PM2019-05-09T15:39:30+5:302019-05-09T16:00:12+5:30

मलायकाने काही महिन्यांपूर्वी अरबाज खानसोबत घटस्फोट घेतला आणि आता ती अर्जुनसोबत लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते.

Salman Khan to work with Arjun Kapoor in No Entry sequel | मलायका अरोरावरून झालेले भांडण विसरून सलमान खान आणि अर्जुन कपूर या चित्रपटासाठी येतायेत एकत्र?

मलायका अरोरावरून झालेले भांडण विसरून सलमान खान आणि अर्जुन कपूर या चित्रपटासाठी येतायेत एकत्र?

googlenewsNext
ठळक मुद्देसलमानचा नो एंट्री हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटात सलमानसोबत अर्जुनदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

सलमान खानची बहीण अर्पिता आणि अर्जुन कपूरचे अनेक वर्षं अफेअर होते. पण अफेअरच्या काही वर्षांनंतर त्या दोघांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला. त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या मीडियात चांगल्याच गाजल्या होत्या. अर्पितामुळे अर्जुनचे सलमानच्या कुटुंबियांसोबतच खूपच चांगले संबंध निर्माण झाले होते. त्यामुळे अर्पितासोबतच्या ब्रेकअपनंतरही तो तिच्या कुटंबियांच्या संपर्कात होता. पण अर्पितासोबत ब्रेकअप झाल्यानंतर काहीच वर्षांत मलायका आणि अर्जुनच्या अफेअरच्या चर्चा रंगायला लागल्या. मलायकापासून दूर राहाण्याची सलमानने अर्जुनला वार्निंग देखील दिली आणि त्यामुळेच काही काळ अर्जुन आणि मलायका एकमेकांपासून दूर झाले होते असे म्हटले जाते. 

मलायकाने काही महिन्यांपूर्वी अरबाज खानसोबत घटस्फोट घेतला आणि आता ती अर्जुनसोबत लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. या सगळ्या प्रकरणामुळे अर्जुन आणि सलमानमध्ये दुरावा निर्माण झाला. एकेकाळी सलमान आणि अर्जुन यांची खूपच चांगली मैत्री होती. अर्जुनला सलमान लहान भावाप्रमाणे मानत होता. एकेकाळी अर्जुनचे वजन खूपच जास्त होते. त्यामुळे सलमाननेच त्याला ट्रेनिंग देऊन वजन कमी करायला लावले होते. त्यानेच अर्जुनला बॉलिवूडमध्ये आणले असे देखील म्हटले जाते. पण मलायकाच्या प्रकरणानंतर सलमानने अर्जुनशी बोलणेच बंद केले. अर्जुनची चुलत बहीण सोनम कपूरच्या लग्नात सलमानने अर्जुनकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. सलमानच्या बिग बॉसमध्ये अर्जुनने हजेरी लावली होती. त्यावेळी देखील चित्रीकरण झाल्यावर सलमानला न भेटताच तो गेला होता. सलमान आणि अर्जुन यांच्यातील दुरावा कायम राहाणार असे वाटत असतानाच आता सलमान आणि अर्जुन एका चित्रपटात एकत्र काम करणार असल्याचे म्हटले जात आहे.

सलमानचा नो एंट्री हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटात सलमानसोबत अर्जुनदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याचे वृत्त फिल्मीबीट या वेबसाईटने दिले आहे. या चित्रपटाचे निर्माते अर्जुनचे वडील बोनी कपूर असून हा चित्रपट अनीस बाझमी दिग्दर्शित करणार आहे. सलमानला या चित्रपटाची पटकथा ऐकवण्यात आली असून त्याला ही पटकथा प्रचंड आवडली असल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: Salman Khan to work with Arjun Kapoor in No Entry sequel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.