कलंक या चित्रपटासाठी अलिया भट आणि वरुण धवन नव्हे तर हे कलाकार होते करण जोहरची पहिली चॉईस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 06:01 PM2019-03-09T18:01:18+5:302019-03-09T18:08:40+5:30

कलंक या चित्रपटाची स्टार कास्ट पूर्णपणे वेगळी असणार होती. पण काही कारणास्तव करण जोहरला त्याचा निर्णय बदलावा लागला.

Kalank' was supposed to bring Shah Rukh Khan, Kajol, Ajay Devgn and Rani Mukerji together | कलंक या चित्रपटासाठी अलिया भट आणि वरुण धवन नव्हे तर हे कलाकार होते करण जोहरची पहिली चॉईस

कलंक या चित्रपटासाठी अलिया भट आणि वरुण धवन नव्हे तर हे कलाकार होते करण जोहरची पहिली चॉईस

ठळक मुद्देकरणला कलंक या चित्रपटात शाहरुख खान, काजोल, राणी मुखर्जी आणि अजय देवगण यांना मुख्य भूमिकेत घ्यायचे होते. पण अजय आणि काजोलसोबत त्याचवेळात करणचा वाद झाल्यानंतर त्याच्यासाठी हे शक्य नव्हते

कलंक या चित्रपटाची करण जोहरने घोषणा केल्यापासूनच प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटात माधुरी दीक्षित, संजय दत्त, अलिया भट आणि वरूण धवन यांच्याव्यतिरिक्त आदित्य रॉय कपूर, कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची स्टार कास्ट दमदार असल्याने या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का या चित्रपटाची स्टार कास्ट पूर्णपणे वेगळी असणार होती. पण काही कारणास्तव करण जोहरला त्याचा निर्णय बदलावा लागला.

करण जोहर आणि काजोल यांच्या मैत्रीविषयी आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. ते दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांचे चांगले फ्रेंड्स आहेत. करण तर काजोलला लकी चार्म मानतो आणि त्यामुळेच तो त्याच्या प्रत्येक चित्रपटात तिला घेतो. पण दरम्यानच्या काळात काजोल आणि करण यांच्यात भांडणे झाली होती आणि ते एकमेकांशी बोलतही नव्हते.

काजोलचा नवरा अजय देवगणचा शिवाय हा चित्रपट आणि करण जोहरचा ए दिल मुश्कील हा चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी झालेल्या वादानंतर काजोलने करणशी न बोलणेच पसंत केले होते. पण काही दिवसांपूर्वी या दोघांनी जुन्या गोष्टी विसरून जाऊन नव्याने त्यांच्या मैत्रीला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर करणच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात देखील काजोल आणि अजयने उपस्थिती लावली होती.

करणला कलंक या चित्रपटात शाहरुख खान, काजोल, राणी मुखर्जी आणि अजय देवगण यांना मुख्य भूमिकेत घ्यायचे होते. राणी, काजोल आणि शाहरुखने करणने दिग्दर्शित केलेल्या कुछ कुछ होता है या पहिल्या चित्रपटात एकत्र काम केले होते.

पण अजय आणि काजोलसोबत त्याचवेळात करणचा वाद झाल्यानंतर त्याच्यासाठी हे शक्य नव्हते आणि त्याचमुळे त्याला कलंक या चित्रपटाची स्टार कास्ट बदलावी लागली. 

शाहरुख आणि अजय ऐवजी, शाहरुख आणि रणबीर कपूर यांना घेऊन कलंक हा चित्रपट करावा असा देखील करणने विचार केला होता. पण काही कारणास्तव ते देखील शक्य झाले नाही. त्यामुळे करणने आलिया भट आणि वरुण धवन या सुपरहिट जोडीला घेऊन हा चित्रपट करण्याचे ठरवले. 

Web Title: Kalank' was supposed to bring Shah Rukh Khan, Kajol, Ajay Devgn and Rani Mukerji together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.