बंदीनंतरही सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:57 AM2019-07-12T00:57:56+5:302019-07-12T00:58:54+5:30

संपूर्ण राज्यात शासनाने प्लास्टिक बंदी जाहीर केल्यानंतरही भंडारा शहरासह जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. युझ अ‍ॅण्ड थ्रो संस्कृतीची सवय जडलेल्या नागरिकांमुळे पर्यावरणाची मोठी हाणी होत आहे. दुसरीकडे प्लास्टिकच्या अनिर्बंध वापरावर शासकीय यंत्रणेचा अंकुश दिसत नसल्याने सर्वत्र प्लास्टिक कचरा बोकाळला आहे.

Use plastic bags everywhere even after the ban | बंदीनंतरही सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांचा वापर

बंदीनंतरही सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांचा वापर

Next
ठळक मुद्दे‘युझ अ‍ॅण्ड थ्रो’ची सवय : अनिर्बंध वापरावर अंकुश नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : संपूर्ण राज्यात शासनाने प्लास्टिक बंदी जाहीर केल्यानंतरही भंडारा शहरासह जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. युझ अ‍ॅण्ड थ्रो संस्कृतीची सवय जडलेल्या नागरिकांमुळे पर्यावरणाची मोठी हाणी होत आहे. दुसरीकडे प्लास्टिकच्या अनिर्बंध वापरावर शासकीय यंत्रणेचा अंकुश दिसत नसल्याने सर्वत्र प्लास्टिक कचरा बोकाळला आहे.
शासनाने १ नोव्हेंबर २०११ पासून राज्यात प्लास्टिक बंदी केली. ३५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांना ही बंदी आहे. मात्र सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांचा वापर होताना दिसत आहे. बाजारात ग्राहक सर्रास प्लास्टिक पिशव्यांची मागणी करतात. प्लास्टिकचा कचरा वाढू लागल्याने शासनाने त्यावर बंदी आणली. परंतु त्यानंतरही शासकीय यंत्रणेकडून अंमलबजावणी होत नसल्याने प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण आले नाही.
वजनाने हलक्या असल्याने प्लास्टिक पिशव्या हवेबरोबर वाहत जावून पाणीसाठे, जंगल आणि जमीनीवर साचतात. मोकाट जनावरे, जलचर प्राणी अन्न समजून या प्लास्टिक पिशव्या गिळतात. आतड्यात प्लास्टिक साचल्याने त्यांचा मृत्यू होतो. पावसाळ्यात प्लास्टिक पिशव्यामुळे गटारे कोंबून पाणी साचते. डबके निर्माण झाल्याने डासांची पैदास होऊन रोगराई निर्माण होते. एवढेच नाही तर प्लास्टिकमधील पॉलीमर्स जमीन, पाणी व अन्नसाखळी दुषीत करतात. ही मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक बाब आहे. त्यासाठी प्लास्टिक पिशव्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
प्लास्टिकच्या अतिवापराने आज विविध समस्या निर्माण झाल्या आहे. भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलात वन्य प्राणी आहेत. हे प्राणी प्लास्टिकच्या विळख्यात सापडण्याची भीती आहे. वन्यप्राण्यांनी प्लास्टिक भक्ष्यण केले तर त्यांनाही धोका होऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीने ठरविले तर प्लास्टिकपासून मुक्ती मिळू शकते यासाठी जनजागृतीची गरज आहे. यासोबतच कायद्याची अमंलबजावणी कडक करण्याची गरज आहे. प्लास्टिक प्रदूषणामुळे होणाऱ्या दुष्परिणामाचा अभ्यास येथील पर्यावरण प्रेमी वसुंधरा फाळके यांनी केला आहे. यात त्यांनी प्लास्टिकमुळे होणाºया दुष्परिणामावर प्रकाश टाकला. प्रत्येक नागरिकाने जागरुक राहून प्लास्टिकचा वापर टाळल्यास पर्यावरणाची होणारी हानी टाळता येऊ शकते.

प्लास्टिक हे नाशवंत नाही. त्याचे विघटन होत नाही. याची माहिती अनेकांना नसते. त्यामुळे पर्यावरणाची हानी होती. त्यासाठी प्लास्टिकच्या अनिर्बंध वापरावर अंकुश ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
-वसुंधरा फाळके,
पर्यावरण अभ्यासक, भंडारा

Web Title: Use plastic bags everywhere even after the ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.