अंधश्रद्धेला खतपाणी घालू नका

By admin | Published: June 17, 2016 12:44 AM2016-06-17T00:44:34+5:302016-06-17T00:44:34+5:30

अंधश्रद्धेने ग्रासलेल्या, व्यसनाधीन, दारिद्र्यात खितपत पडलेल्या दु:खी मानवाचा उद्धार करावयाचा असेल तर या विज्ञान युगात भोंदू बाबा,

Do not treat superstition anymore | अंधश्रद्धेला खतपाणी घालू नका

अंधश्रद्धेला खतपाणी घालू नका

Next

दिघोरे यांचे प्रतिपादन : चिचाळ येथे व्यसनमुक्ती कार्यक्रम
चिचाळ : अंधश्रद्धेने ग्रासलेल्या, व्यसनाधीन, दारिद्र्यात खितपत पडलेल्या दु:खी मानवाचा उद्धार करावयाचा असेल तर या विज्ञान युगात भोंदू बाबा, साधू महंत महाराज यांचे चमत्कारावर विश्वास न ठेवता वर्षानुवर्षे पोखरून टाकणारी ही अंधश्रद्धेची व्याधी नष्ट करावयाची असेल तर महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या मानव धर्म शिकवणीचा प्रसार प्रचार करणे अत्यंत काळाची गरज आहे. असे प्रतिपादन परमात्मा एक सेवक मंडळ चिचाळ ज्येष्ठ मार्गदर्शक जयराम दिघोरे हे चिचाळ येथील व्यसनमुक्ती अभियान कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
परमात्मा एक सेवक मंडळ चिचाळच्या वतीने व्यसनमुक्ती अभियान कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्गदर्शक जयराम दिघोरे प्रमुख अतिथी वासुदेव लेंडे, निमराज काटेखाये, धनराज दिघोरे, प्रकाश हातेल, भाऊदास पडोळे, भाऊराव लांजेवार, कुसुम दिघोरे, सुनिता हातेल, सुनंदा लोहकर, लता काटेखाये, परसराम दिघोरे, हुसन जिभकाटे, उद्धव जिभकाटे, गोमा लोहकर, गोविंदा तिभागेबार, महादेव जिभकाटे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक जयराम दिघोरे यांचे सर्व सेवकांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांना मार्गदर्शन करताना जयराम दिघोरे म्हणाले, बाबा जुमदेवजींनी एका भगवंताची प्राप्ती करून सन १९४९ ला मानवधर्माची स्थापना करून मानवाच्या जीवन सफल करण्यासाठी बाबानी चार तत्व, तीन शब्द व पाच नियम दिले. बाबा अंधश्रद्धेला विरोध करीत असत. बाबा कोणत्याही सेवकाकडून गुरुदक्षिणा घेत नसत व प्रत्येक आत्म्यात परमेश्वर असल्याने ते पाया पडून देत नव्हते. बाईला तर फार लांब उभे ठेवत असत. बाबा नेहमी सत्कर्म करीत असत व सेवकांनाही सत्कर्म करावयाच सांगत. भगवंताने मानवाला निर्माण केल्याने आपल्या सर्वांचा विधाना एक भगवान आहे असे सांगत. परमेश्वरी कृपेचा लाभ अनेक सेवकांनी शारीरिक दु:खाबरोबर त्यांनी त्यांचे मानसिक, आर्थिक व सामाजिक दु:खही दूर झाली असल्याचे म्हणाले. संचालन धनराज दिघोरे व आभार परसराम दिघोरे यांनी मानले. कार्यक्रमाला गोमा लोहकर, धनराज लोहकर, भीवा काटेखाये, बालू नेवारे, शेखर बिलवणे, चैतन्य नंदपुरे, मनोज वैरागडे, शामलता अहिर, कैलाश गडकर, हिरालाल काटेखाये व सेवक सेविका उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Do not treat superstition anymore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.