सरकारकडून धर्माच्या नावाखाली विष -शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:25 AM2019-02-24T00:25:20+5:302019-02-24T00:26:53+5:30

महाराष्ट्रात गंभीर दुष्काळी परिस्थिती असताना केंद्र आणि राज्य सरकारकडून अद्याप मदत दिली जात नाही. जनतेला मदत करण्याची या सरकारची भावनाच नाही. जनावरांना चारा नाही. एकही छावणी सुरु नाही. रोजगार हमीची कामे नाहीत. याकडे लक्ष देण्याऐवजी हे सरकार धर्माच्या नावाखाली समाजामध्ये विष पसरवत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे केली.

Poison in the name of religion by the government, Sharad Pawar | सरकारकडून धर्माच्या नावाखाली विष -शरद पवार

सरकारकडून धर्माच्या नावाखाली विष -शरद पवार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परळी (जि. बीड) : महाराष्ट्रात गंभीर दुष्काळी परिस्थिती असताना केंद्र आणि राज्य सरकारकडून अद्याप मदत दिली जात नाही. जनतेला मदत करण्याची या सरकारची भावनाच नाही. जनावरांना चारा नाही. एकही छावणी सुरु नाही. रोजगार हमीची कामे नाहीत. याकडे लक्ष देण्याऐवजी हे सरकार धर्माच्या नावाखाली समाजामध्ये विष पसरवत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे केली.
परळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीच्या वतीने शनिवारी दुसऱ्या संयुक्त जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रा. जोगेंद्र कवाडे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.
या सरकारने धनगर, मराठा, मुस्लिम समाजाची आरक्षणाच्या मुद्दावर फसवणूक केली आहे. शेतकरी, तरु ण बेरोजगारांचीही दिशाभुल केली आहे. जाती धर्माच्या नावावर द्वेष पसरविला जात आहे. आरक्षणाच्या माध्यमातूनही जातीय धोरण अवलंबिले जात आहे. जनतेमध्ये दुही पसरविण्याचे काम या सरकारकडून होत असल्याचे पवार म्हणाले.

...तर हे सरकार संविधान बदलेल
- अशोक चव्हाण
३० टक्के मतांच्या जोरावर त्यांनी सत्ता मिळविली. ७० टक्के मतदान विखुरल्यामुळे ते सत्तेत आले. विखुरलेल्या मतदारांना एक करण्यासाठी ही महाआघाडी एक झाली आहे. राज्यात व केंद्रात सत्ता परिवर्तन अटळ आहे. यांच्या हाती पुन्हा सत्ता दिलीच तर पाच वर्षात आपल्याला मतदानाचा अधिकार राहणार नाही, ते संविधान बदलतील अशी भीती माजी मुख्यमंत्री व कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. चव्हाण म्हणाले, दुष्काळात शेतकºयांना शासनाने कसलीही मदत केली नाही. त्यामुळे हे सरकार भिकारी सरकार आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा हम करे सो कायदा सुरू आहे. मराठवाड्यातील जनतेला या सरकारच्या काळात काहीच मिळाले नाही. केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र व मंत्रालयात उंदरं असल्याची खिल्लीही चव्हाण यांनी उडवली.

Web Title: Poison in the name of religion by the government, Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.