केवळ एका महिलेचा उष्माघाताने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 12:34 AM2019-05-07T00:34:29+5:302019-05-07T00:34:55+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत सात लोकांचा मृत्यू हा उष्माघाताने झाल्याच्या अफवा पसरल्या. या सर्व मयतांची माहिती घेऊन आरोग्य विभागाने चौकशी केली. सर्व वैज्ञानिक अहवाल प्राप्त केले. या चौकशी अंती केवळ एकाच महिलेचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे समोर आले आहे.

Only a woman's fatal death | केवळ एका महिलेचा उष्माघाताने मृत्यू

केवळ एका महिलेचा उष्माघाताने मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देआरोग्य विभागाचा अहवाल : पाच जणांच्या मृत्यूचे कारण वेगवेगळे

बीड : जिल्ह्यात आतापर्यंत सात लोकांचा मृत्यू हा उष्माघाताने झाल्याच्या अफवा पसरल्या. या सर्व मयतांची माहिती घेऊन आरोग्य विभागाने चौकशी केली. सर्व वैज्ञानिक अहवाल प्राप्त केले. या चौकशी अंती केवळ एकाच महिलेचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे समोर आले आहे. इतर पाच मृत्यूंची कारणे वेगवेगळी असल्याचे अहवालावरुन स्पष्ट झाले.
सुमता देविदास बेडके (५० रा.राजापूर ता.गेवराई) असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, यावर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यातच मार्च, एप्रिल महिन्यात कडक ऊन जाणवले. पारा ४५ अंशांच्यावर गेला होता. त्यामुळे अंगाची लाही लाही होत होती. याच उन्हाच्या त्रासामुळे सहा लोकांचा मृत्यू झाल्याच्या अफवा पसरल्या.
यामध्ये शिवराज संदीपानराव खरसाडे (३० रा.पाचेगाव ता.गेवराई), चंद्रकांत मारूती हिरवे (४० रा.माळीवेस बीड), परमेश्वर दादाराव वाघ (४४ रा.कदमवाडी ता.बीड), विक्रम भीमराव गायकवाड (३८ रा.बनसारोळा ता केज), दत्तात्रय सुदाम चव्हाण (१६ बीड सांगवी ता.आष्टी) यांचा समावेश आहे. खरसाडे यांचे शवविच्छेदन करून व्हिसेरा राखीव ठेवला आहे. तर हिरवे आणि वाघ यांचा मृत्यू हृदयात रक्ताच्या गाठीने पुरेशा रक्त पुरवठ्याअभावी, गायकवाड यांचा लिव्हरवर सूज आल्याने तर चव्हाण याचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकृष्ण पवार, प्रभारी अतिरिक्ति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम यांच्या मार्गदर्शनखाली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणांची चौकशी केली आहे.

Web Title: Only a woman's fatal death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.