परळीला जिल्ह्याचा दर्जा द्यावा; भाजपचे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:00 AM2018-02-22T00:00:06+5:302018-02-22T00:00:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क परळी : प्रशासकीय व इतर सोयी सुविधांच्या दृष्टीने शासनाने परळी शहराला जिल्ह्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी ...

District level should be given to Parli; Request for BJP tahsildar | परळीला जिल्ह्याचा दर्जा द्यावा; भाजपचे तहसीलदारांना निवेदन

परळीला जिल्ह्याचा दर्जा द्यावा; भाजपचे तहसीलदारांना निवेदन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : प्रशासकीय व इतर सोयी सुविधांच्या दृष्टीने शासनाने परळी शहराला जिल्ह्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी भाजपच्या वतीने बुधवारी करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र हे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील प्रसिद्ध शहर आहे. परळीला असलेल्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून तयार होणाºया विजेचा राज्यासह संपूर्ण देशाला पुरवठा होतो. दळणवळणाच्या दृष्टीने याठिकाणी रेल्वे स्टेशन आहे, ज्यामुळे शहराचा इतर राज्यातील प्रमुख शहरांशी आर्थिक व व्यावसायिक दृष्ट्या दैनंदिन संपर्क साधला जातो. केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या नकाशावर हे शहर आता आले असून शहरातून तीन राष्ट्रीय महामार्ग जात आहेत, ही शहर विकासाच्या दृष्टीने उपलब्धी आहे.

परळी शहराला जिल्ह्याचा दर्जा द्यावा, ही येथील जनतेची फार पूर्वीपासूनची मागणी आहे. शहर व तालुक्याचे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक व क्रीडा विषयक वातावरण अतिशय चांगले असून अनेकांनी आपापल्या क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करून शहराचा नावलौकिक वाढवला आहे. परळी हे सध्या तालुक्याचे ठिकाण असले तरी कापूस उत्पादक पणन महासंघ, पाटबंधारे विभागाचे व अन्य काही विभाग स्तरावरचे कार्यालय याठिकाणी आहेत. शहर व तालुका नैसर्गिक साधन सामुग्रीने संपन्न आहे. वाण धरणात मुबलक पाणी आहे.

सध्या या शहराला असलेले बीड हे जिल्हयाचे ठिकाण शंभर किमी दूर व प्रशासकीय कामाच्या दृष्टीने अतिशय गैरसोयीचे व त्रासदायक आहे. त्यामुळे जिल्हा निर्मितीच्या दृष्टीने योग्य आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.

भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, ज्येष्ठ नेते दत्ताप्पा ईटके, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष अशोक जैन, राजेश गिते, प्रकाश जोशी, अरूण टाक, प्रा. दासू वाघमारे, नगरसेवक प्रा. पवन मुंडे, उमाताई समशेटे, राजेंद्र ओझा, महादेव ईटके, रवि कांदे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष योगेश मेनकुदळे, मोहन जोशी, सचिन गिते, नितीन समशेटे, अरूण पाठक, अनिश अग्रवाल, योगेश पांडकर, गोविंद चौरे, गणेश होळंबे, फैसल कुरेशी, स. जहीर, रमेश गायकवाड, तानाजी वाव्हळेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परळीत या आहेत सुविधा
वीज केंद्र, रेल्वे स्टेशन, राष्ट्रीय महामार्ग यामुळे याठिकाणी उद्योग व व्यापार वाढीला मोठी चालना मिळाली आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना व त्याच्याशी संलग्न असलेले वीज निर्मिती प्रकल्प, डिस्टीलरी यामुळे साखर उत्पादन होण्याबरोबरच शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार तरूणांना आर्थिक हातभार लागण्यास मदत झाली आहे.

Web Title: District level should be given to Parli; Request for BJP tahsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.