पत्नीस माहेरी सोडून घाटीतील सफाई कर्मचाऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:46 PM2019-01-22T12:46:44+5:302019-01-22T12:47:44+5:30

सायंकाळी निलेशची आई घरी आली असता त्यांना किचनचा दरवाजा बंद दिसला.

Suicide of Ghati's staff in Aurangabad | पत्नीस माहेरी सोडून घाटीतील सफाई कर्मचाऱ्याची आत्महत्या

पत्नीस माहेरी सोडून घाटीतील सफाई कर्मचाऱ्याची आत्महत्या

googlenewsNext

औरंगाबाद : शासकीय रुग्णालय घाटी येथील एका सफाई कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.२१ ) रात्री ९ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. निलेश सुभाष बनसोड (वैशाली नगर, २६ ) असे मृताचे नाव असून त्याचे एक महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. 

याबाबत अधिक माहिती अशी की, घाटी रुग्णालयात निलेश सुभाष बनसोड हा गतवर्षी वडिलांच्या जागी अनुकंपावर रुजू झाला होता. निलेश याचा मागील महिन्यात विवाह झाला होता. सोमवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान त्याने आपल्या पत्नीस जयभीम नगर येथील माहेरी नेऊन सोडले. त्यानंतर, मी घाटीमध्ये कामावर जात आहे असे सांगून तो निघून गेला. यानंतर दिवसभरात त्याने पत्नीशी संपर्क केला नाही. 

सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान निलेशची आई घरी आली असता त्यांना किचनचा दरवाजा बंद दिसला. मुलगा आराम करत असल्याचे समजून त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र, रात्री ९ वाजेच्या दरम्यानसुद्धा दरवाजा उघडला गेला नाही. यामुळे निलेशच्या आईने घरमालकास बोलावून आणले, त्यांनी किचनच्या खिडकीला उघडून पाहिले असता आत साडीच्या सहाय्याने निलेशने गळफास घेतल्याचे आढळून आले. 

Web Title: Suicide of Ghati's staff in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.