मालवाहतूकदारांचा शुक्रवारपासून चक्का जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:05 AM2018-07-18T01:05:37+5:302018-07-18T01:07:49+5:30

डिझेलचे भाव कमी करावते किंवा ६ महिने स्थिर किंमत ठेवावी, या प्रमुख मागणीसह अन्य प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी देशभरातील मालवाहतूकदार संघटना शुक्रवार, २० जुलैैपासून बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरू करणार आहेत.

The cargo holders on strike from Friday | मालवाहतूकदारांचा शुक्रवारपासून चक्का जाम

मालवाहतूकदारांचा शुक्रवारपासून चक्का जाम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डिझेलच्या किमती वाढल्याने कंपन्यांशी करारावर चालणाऱ्या मालट्रकच्या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. डिझेलचे भाव कमी करावते किंवा ६ महिने स्थिर किंमत ठेवावी, या प्रमुख मागणीसह अन्य प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी देशभरातील मालवाहतूकदार संघटना शुक्रवार, २० जुलैैपासून बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरू करणार आहेत.
आॅल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट काँग्रेसच्या वतीने चक्का जामची हाक दिली आहे. यास औरंगाबाद मालवाहतूकदार संघटनेने संपूर्ण पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत संघटनेचे अध्यक्ष फय्याज खान यांनी सांगितले की, देशात ९० टक्के मालवाहतूक ट्रकद्वारेच होत असते. ट्रकचा ६५ टक्के खर्च डिझेलवर होत असतो. मागील ६ ते ७ महिन्यांत डिझेल लिटरमागे १६ रुपयांपर्यंत महागले आहे. मालट्रक व्यावसायिकांचा वर्षभरासाठी कंपन्यांशी करार झालेला असतो. मात्र, तेल कंपन्या दररोज १० ते ३० पैैसे भाववाढ करतात. कंपन्याही एकदम भाव वाढूवून देत नाहीत. सहा-सहा महिन्यांनंतर कंपन्या करारात डिझेलवाढीचा निर्णय घेतात. तोपर्यंत मालट्रक व्यावसायिकांना लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. केंद्र सरकारने डिझेलचे भाव कमी करावे. तसेच भाववाढ एकदम करावी, नंतर सहा महिने तेच भाव स्थिर ठेवावे, ही आमची प्रमुख मागणी आहे. २० रोजीच्या संपात देशातील ९५ लाख मालट्रक सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील २२ लाख पन्नास हजार आणि त्यामध्येच औैरंगाबादेतील साडेचार लाख ट्रकचा समावेश आहे.
पहिले चार कंपन्यांचे कच्चामाल आणणे व उत्पादित वस्तू नेणे बंद करण्यात येईल. त्यानंतर सरकारने दुर्लक्ष केले तर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही बंद केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. केंद्र सरकारने लेखी व तोंडी आश्वासन न देता आता निर्णय घ्यावा व त्याची अंमलबजावणी सुरू केल्यानंतरच मालट्रकचे चक्का जाम आंदोलन मागे घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट सांगितले. यावेळी असद अहमद, जयकुमार थानवी, एम.जी. इरफानी, राजेंद्र माहेश्वरी आदीं मालवाहतूकदारांची उपस्थिती होती.

Web Title: The cargo holders on strike from Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.