कारची दुचाकीला धडक; दोन युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:44 AM2018-05-25T00:44:08+5:302018-05-25T00:44:29+5:30

औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील सारोळा फाट्यावर कार व दुचाकीच्या अपघातात २ युवक ठार झाल्याची घटना बुधवारी (दि.२३) रात्री उशिरा घडली.

 Car bikes; Two youths killed | कारची दुचाकीला धडक; दोन युवक ठार

कारची दुचाकीला धडक; दोन युवक ठार

googlenewsNext

फुलंब्री : औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील सारोळा फाट्यावर कार व दुचाकीच्या अपघातात २ युवक ठार झाल्याची घटना बुधवारी (दि.२३) रात्री उशिरा घडली.
कल्याण सुरेश गायकवाड (२२, रा. गणोरी), अमोल भीमराव चव्हाण (२९, रा. बिल्डा, ता. फुलंब्री) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, कल्याण गायकवाड व अमोल चव्हाण हे दोन्ही मित्र औरंगाबाद येथे कंपनीत नोकरीला आहे. बुधवारी सायंकाळी कामावरून सुटी झाल्यानंतर ते औरंगाबादहून गावाकडे दुचाकीवरून (क्र.एम. एच-२० डी.वाय-६८३३) जात असताना फुलंब्रीकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या कारने (क्र. एम. एच-२० सी.एच-६६७१) सारोळा फाट्यावर दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात कल्याण व अमोल हे दोघेही गंभीर जखमी झाले. मार्गावरून जाणाºया प्रवाशांनी दोन्ही जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान दोन्ही दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. कल्याण गायकवाड याच्यावर गणोरी येथे, तर अमोल चव्हाण याच्यावर बिल्डा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title:  Car bikes; Two youths killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.